- Table View
- List View
Itihas Va Rajyashastra class 10 - Maharashtra Board: इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneइतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात दोन भाग दिले आहेत. इतिहासाच्या भागात ‘उपयोजित इतिहास’ दिलेला आहे. रोजच्या जीवनातील कोणतीही गोष्ट असो, व्यवसायाचे कोणतेही क्षेत्र असो, त्या त्या गोष्टींचा, त्या त्या व्यावसायिक क्षेत्रांच्या विकासाचा स्वतःचा इतिहास असतो. त्या इतिहासाच्या ज्ञानाचा व्यवसायातील कौशल्यवाढीसाठी उपयोग होतो, ही बाब या पाठ्यपुस्तकात स्पष्ट केलेली आहे. राज्यशास्त्राच्या भागात ‘भारतीय संविधानाची वाटचाल’ याविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक प्रक्रियेची माहिती, राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरील प्रमुख राजकीय पक्ष, त्यांची भूमिका, लोकशाहीला सक्षम करणाऱ्या सामाजिक व राजकीय चळवळी तसेच भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने यांबाबत चर्चा केलेली आहे.
Vidnyan Ani Tantradnyan Bhag 2 class 10 - Maharashtra Board: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneविज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता दहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घेऊन व इतरांना समजावा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड तसेच या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’, ‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. या सर्व कृती ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती विचारप्रक्रियेला चालना देतील.
Ganit Bhag 1 class 10 - Maharashtra Board: गणित भाग 1 इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता दहावी भाग 1 हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात सहा प्रकरण व त्याचे सरावसंच आणि उत्तरसूची दिलेली आहे. यामध्ये बीजगणित, आलेख, अर्थनियोजन व सांख्यिकी ही मुख्य क्षेत्रे अर्थनियोजनात GST या नव्या करप्रणालीचा अभ्यास, प्रत्येक प्रकरणात नमुन्याची सोडवलेली उदाहरणे, सरावासाठी उदाहरणे इत्यादी या पुस्तकात समजावून दिले आहे. गणिताचा अभ्यास करताना विविध घटकांतील महत्त्वाची सूत्रे, गुणधर्म इत्यादी 'हे मला समजले' असे काही घटक शीर्षकाखाली चौकटीत दिले आहे.
Ganit Bhag 2 class 10 - Maharashtra Board: गणित भाग 2 इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता दहावी भाग 2 हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सात प्रकरण व त्याचे सरावसंच आणि उत्तरसूची दिलेली आहे. यामध्ये भूमिती, त्रिकोणमिती, निर्देशक भूमिती व महत्त्वमापन ही मुख्य क्षेत्रे, इत्यादी या पुस्तकात समजावून दिले आहे. गणिताचा अभ्यास करताना विविध घटकांतील महत्त्वाची सूत्रे, गुणधर्म इत्यादी 'हे मला समजले' असे काही घटक शीर्षकाखाली चौकटीत दिले आहे.
Swavikas Va Kalarsaswad class 10 - Maharashtra Board: स्व-विकास व कलारसास्वाद इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneस्व-विकास व कलारसास्वाद इयत्ता दहावीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. स्व-विकास व कलारसास्वाद या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा दैनंदिन जीवनाशी निगडित गोष्टींशी आहे. पुस्तिकेची सुरुवात चित्रमय कथेतून केली आहे. चित्रातून पुढच्या प्रकरणात काय शिकणार आहोत याचा संदेश दिला आहे. या पाठ्यपुस्तकातून 'थोडी गंमत करू' व 'चर्चा करा' अशा अनेक कृतींतून हा विषय शिकणार आहात. पाठ्यपुस्तकात अनेक छोट्या छोट्या खेळांचा समावेश केलेला आहे. त्या खेळांतून तुम्ही बरेच काही शिकणार आहात. दिलेले उपक्रम, त्यांची कार्यवाही व त्या दरम्यान आवश्यक असणारी कृती स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करुन अध्ययन सुकर केले गेले आहे.
Bhugol class 9 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता नववीं - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता नववीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये वस्तू नेमक्या कशा तयार झाल्या, त्या कोठून आल्या, या वस्तूंचा मूलस्रोत नेमका कोणता, मानव आणि निसर्ग यांच्या आंतरक्रियेतून मानवी जग कसे निर्माण होते, मानवी समूह, संस्कृती, समाज व अर्थकारण यांचा विकासाशी असणारा संबंध, आंतरजालाचा वापर, परिणाम इत्यादी बाबी या पाठ्यपुस्तकामध्ये समजाविल्या आहेत. या विषयातून आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास केला आहे. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण, चिकित्सक विचार ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. जोपासा, नकाशे, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने दर्शविली आहेत.
Ganit Bhag 1 class 9 - Maharashtra Board: गणित भाग 1 इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित भाग 1 इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. गणित भाग 1 या पाठ्यपुस्तकात संख्याज्ञान, बीजगणित, याशिवाय व्यावहारिक गणित, अर्थनियोजन आणि माहितीचे वर्गीकरण या क्षेत्रांतील घटकांची ओळख होईल. बीजगणित व सांख्यिकीमधील संबोध उच्चशिक्षणातील अभ्यासासाठी पायाभूत आहेत.या पाठ्यपुस्तकात संकल्पना समजून घेण्यासाठी विविध कृती दिल्या आहेत. उजळणीसाठी तसेच सरावसंचांमध्येही कृती दिल्या आहेत.
Sanrakshanshastra Karyapustika Class 9 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र (कार्यपुस्तिका) इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसंरक्षणशास्त्र (कार्यपुस्तिका) नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तिकेत संरक्षणशास्त्र विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संरक्षणशास्त्र या कार्यपुस्तिकेचा मूळ हेतू तुमच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रहित, देशप्रेम या मूल्यांची जोपासना व्हावी हा आहे. चर्चा, क्षेत्रभेटी, मुलाखत, भूमिका अभिनय अशा अनेक कृतींतून तुम्ही हा विषय अभ्यासणार आहात. हे सर्व उपक्रम तुम्ही आवर्जून करावयाचे आहेत. या उपक्रमातून तुमच्या विचारप्रक्रियेला चालना मिळेल. चर्चेतून मिळालेले मुद्दे व माहिती लिहिण्यासाठी पुस्तिकेत पुरेशी जागा दिलेली आहे. चर्चा, क्षेत्रभेटी, मुलाखती अशा अनेक कृतींतून हा विषय अभ्यासणार आहोत.
Marathi Kumarbharati class 9 - Maharashtra Board: मराठी कुमारभारती इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी कुमारभारती इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकात विचारशक्ती, कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला संधी देण्यासाठी अनेक कृती दिल्या आहेत, भाषाभ्यासाच्या कृतींतून भाषेचे घटक, त्यांचे उपयोग समजावून सांगितले आहेत. त्याचबरोबर लेखनक्षमता व अभिव्यक्ती विकास यांसाठी विविध कृती व नमुने दिले आहेत, या कृतींतून लेखनकौशल्य व वाङ्मयीन अभिरुची नक्कीच वाढणार आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करावयाचा आहे. व त्याचे फायदेही समजुन दिले आहेत. पाठ्यघटकाशी संबंधित पूरक माहिती पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या संदर्भग्रंथ सूचीचा व संकेतस्थळांचा अभ्यासासाठी वापर करावा असे स्पष्ट करुन सांगितले आहे.
Vidnyan Ani Tantradnyan Bhag 1 class 10 - Maharashtra Board: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneविज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता दहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घेऊन व इतरांना समजावा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड तसेच या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’, ‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. या सर्व कृती ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती विचारप्रक्रियेला चालना देतील.
Vidnyan Ani Tantradnyan class 9 - Maharashtra Board: विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneविज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घेऊन व इतरांना समजावा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड तसेच या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’,‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. या सर्व कृती ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती विचारप्रक्रियेला चालना देतील.
Aamod Sampurn-Sanskritam class 10 - Maharashtra Board: आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneआमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता दहावीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक संस्कृत भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये एकूण पंधरा अध्याय दिले आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना केली आहे. परीक्षेच्या फायद्यासाठी उपयुक्त असलेले हे पाठ्यपुस्तक आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत.
Swavikas Va Kalarsaswad class 9 - Maharashtra Board: स्व-विकास व कलारसास्वाद इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneस्व-विकास व कलारसास्वाद इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. स्व-विकास व कलारसास्वाद या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा दैनंदिन जीवनाशी निगडित गोष्टींशी आहे. पुस्तिकेची सुरुवात चित्रमय कथेतून केली आहे. चित्रातून पुढच्या प्रकरणात काय शिकणार आहोत याचा संदेश दिला आहे. या पाठ्यपुस्तकातून 'थोडी गंमत करू' व 'चर्चा करा' अशा अनेक कृतींतून हा विषय शिकणार आहात. पाठ्यपुस्तकात अनेक छोट्या छोट्या खेळांचा समावेश केलेला आहे. त्या खेळांतून तुम्ही बरेच काही शिकणार आहात. दिलेले उपक्रम, त्यांची कार्यवाही व त्या दरम्यान आवश्यक असणारी कृती स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करुन अध्ययन सुकर केले गेले आहे.
Khelu Karu Shiku Class 1 - Maharashtra Board: खेळू करू शिकू इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneखेळू, करू, शिकू इयत्ता पहिली हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये मुलांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी उपयोगी आहे. तसेच या पुस्तकामध्ये भरपूर चित्रे आहेत. ति पाहून कोणते खेळ कसे खेळावे हे कळण्यास मदत होईल. गाणी म्हणणे, एखादे वाद्य वाजवणे, चित्रे काढून ती रंगवणे, नृत्य, नाट्य या कला शिकण्यास कशाप्रकारे मदत होईल हे दाखवले आहे. कागदाचा पंखा, बाहुली, खेळणी अशा छान वस्तू तयार कशा करायच्या हे दाखवले आहे.
Marathi Balbharati Class 1 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी बालभारती इयत्ता पहिली हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात गाणी आहेत. ती सगळ्यांनी मिळून म्हणताना तुम्हांला खूप मजा येईल. तसेच इथे गोष्टीसुद्धा आहेत. गोष्टी ऐकताना, सांगताना मोठी धमाल वाटेल. चित्रांवरून गोष्टी तयार करून त्या मित्रमैत्रिणींना सांगताना तुम्ही अगदी रमून जाल. चित्रे पाहून गप्पा मारताना, तुमचे अनुभव ऐकताना सर्वांना खूप गंमत वाटेल. भाषेतील शब्द, अक्षरे शिकण्यासाठी तुम्हाला आवडणारी खूप रंगीत चित्रे दिलेली आहेत. चित्रांवरून शब्द आणि अक्षरे शिकताना तुम्हाला नक्कीच गंमत वाटेल. ऐकायचे, पाहायचे आणि म्हणत म्हणत वाचायला शिकायचे, गिरवत गिरवत लिहायला शिकायचे, सरावातून ते पक्के करायचे, सारे काही अगदी मजेत. इथे शब्दांचे काही खेळसुद्धा दिले आहेत. ते खेळत खेळत भाषा शिकायची आहे.
Marathi Balbharati Class 3 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी बालभारती इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्पुस्तकात घर व परिसरातून अनौपचारिकपणे मुलांची शब्दसंपत्ती विकसित झालेली आहे. शाळेत आल्यानंतर पहिली व दुसरीमध्ये मूल वाचायला व लिहायला शिकले आहे. इयत्ता तिसरीमध्ये त्याला श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे अवगत करता यावीत, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पूरक वाचन साहित्याची निवड केलेली आहे. निवड करताना मुलांचे भावविश्व, अनुभव, परिसरातील घटना व प्रसंग यांचा विचार केला आहे. गाभाघटक, मूल्ये, जीवनकौशल्ये यांचा अंतर्भाव पाठांतील आशयात तसेच स्वाध्याय, भाषिक कृती, उपक्रम व प्रकल्पांत केलेला आहे. विविध भाषिक कृतींच्या माध्यमातून शिकताना विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती सहजतेने करू शकतील व यातूनच त्यांचा भाषिक विकासही साधता येईल.
Ganit Class 2 - Maharashtra Board: गणित इयत्ता दुसरी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता दुसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात वस्तूंची मोजणी तुम्हाला करता येते. आता लहान बेरजा व नंतर वजाबाक्या शिकायच्या आहेत. कृती किंवा रीत नीट समजून सांगितली आहे.. मग त्यातली गंमत अनुभवता येईल. रेषांचा व विविध आकारांचा अभ्यास करताना तुम्हाला चित्रे काढायची आहेत. चित्रे काढणे व रंगवणे तुम्हाला आवडते ना? त्यासाठी संधी मिळेल. लहान संख्यांच्या बेरजा व वजाबाक्या शिकण्यासाठी मजेदार खेळांचा उपयोग होईल. लहान संख्यांच्या बेरजा आणि वजाबाक्या बरोबर करता आल्या, तर पुढच्या वर्गासाठी गणित सोपी होतील.
Ganit Class 1 - Maharashtra Board: गणित इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता पहिली हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात रंगीत चित्रं, खेळ, कविता आहेत. त्यामधून गमतीजमतीने शिका, भरपूर खेळा, नाचा, उड्या मारा आणि अभ्यासही करा. वस्तूंची मोजणी शिकायची तर आधी एक ते दहा आणि मग अकरा ते वीस या संख्या ओळीने म्हणता आले पाहिजे. त्यासाठी पुस्तकात मजेदार गाणी दिली आहेत. बोटांसाठी कागदाच्या रंगीत टोप्या करुन दिलेल्या आहेत. बेरीज-वजाबाकी या क्रिया आपल्याला रोज कराव्या लागतात, म्हणून त्यांचा खूप सराव करावा लागणार आहे.
Yuddha Ani Shanti: युद्ध आणि शांती
by Prof. A. N. Pednekarप्रस्तुत ग्रंथ “युद्ध आणि शांती” हा टॉल्स्टॉयच्या “WAR AND PEACE” या जगप्रसिद्ध कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद आहे. सदर अनुवाद मंडळाच्या वतीने प्रा. आ. ना. पेडणेकर यांनी केला असून तो मंडळाच्या भाषांतरमालेत प्रकाशित करण्यात आला आहे.
Shakespeare Paricaya grantha: शेक्सपिअर परिचय ग्रंथ
by Maharashtra Rajya Sahitya Sanskriti Mandal Mumbaiशेक्सपिअरच्या जन्माला इ.स. १९६४ मध्ये ४०० वर्षे पूर्ण झाली. त्या वर्षी सर्व जगभर झालेल्या उत्सवावरून या अद्वितीय नाटककाराची मोहिनी जनमानसावर किती आहे हे दिसून आले. प्रत्येक देशात थोड्याफार प्रमाणावर त्याचे वाङ्मय व चरित्र याबद्दल चर्चा करण्यात आली. इंग्लिश बोलणाऱ्या देशांत व विशेषतः इंग्लंड, अमेरिका वगैरे देशांत गौरवग्रंथ निर्माण झाले, शेकडो व्याख्याने, परिषदा वगैरे कार्यक्रम घडून आले व आधीच जगप्रसिद्ध असलेल्या या साहित्यसम्राटाची कीर्ती सामान्य लोकांच्या कानांवरही सारखी पडत राहिली. शेक्सपिअरबद्दल आतापर्यंत निरनिराळ्या देशांतून व भाषांतून इतके लेखन झाले आहे की त्या लेखनानेच अनेक मोठी ग्रंथालये भरू शकतील. केवळ शेक्सपिअरचे ग्रंथ व त्यांवरील वाङ्मय याकरिता स्वतंत्र ग्रंथालये अनेक देशांत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे फक्त शेक्सपिअरच्या वाङ्मयाची चर्चा करणारी अनेक नियतकालिकेही आहेत. इंग्लंडमध्ये दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या Shakespeare Survey सारख्या उच्च दर्जाच्या पुस्तकांत शेक्सपिअरसंबंधी चाललेल्या संशोधनाचा आढावा, नवीन ग्रंथांची परीक्षणे, इतर भाषांतील संशोधन वगैरे सर्व गोष्टींचा उल्लेख असतो. अशाच तऱ्हेची बरीच नियतकालिके अमेरिका, जर्मनी इत्यादी देशांतही वर्षानुवर्षे चालू आहेत हे लक्षात घेतले म्हणजे मन अश्चर्याने थक्क होऊन जाते. कारण सुमारे ३७-३८ नाटके व काही खंडकाव्ये यांवर अनेक ग्रंथालये भरतील इतके वाङ्मय सारखे प्रसिद्ध होत राहावे यावरून शेक्सपिअरबद्दलच्या लोकांच्या भावना, त्याच्याबद्दलचा आदर व त्याची लोकप्रियता, यांची कल्पना येऊन तो एक अतिमानव (Supermen) असला पाहिजे असे वाटू लागते. जगातील कोणत्याही लेखकाबद्दल इतके अव्याहत लेखन अद्यापि तरी झाले नाही व होऊ शकेल असे वाटत नाही. या अलौकीक यशाचे रहस्य काय याचा थोडासा विचार या ग्रंथात केला आहे..
Krantimargavaril Pravasi: क्रांतिमार्गावरील प्रवासी
by Prof. T. S. Kulkarniभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर क्रांतिकारक बाबा पृथ्वीसिंह आझाद यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी १९८९ च्या मार्चमध्ये निधन झाले. अंबाला शहराजवळच्या एका खेड्यात त्यांचा १५ सप्टेंबर, १८९२ रोजी जन्म झाला होता. ते मूळचे रजपूत असून त्यांचे चौधरी घराणे पंजाबात स्थायिक झाले. लहानपणीच त्यांची आई मरण पावली आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे पृथ्वीसिंहांचे वडील शादीराम यांना रोजगार शोधीत ब्रह्मदेशात जावे लागले. पृथ्वीसिंहांचे चुलते दोन पुतण्यांना घेऊन पंजाबातून ब्रह्मदेशात गेले. रशियातील १९०५ ची अयशस्वी क्रांती, बंगालच्या फाळणीविरुद्ध चाललेले आंदोलन, लाला लजपतरायांची हद्दपारी, लोकमान्य टिळकांना झालेली सहा वर्षांची शिक्षा वगैरे घटनांमुळे पृथ्वीसिंहांनी भारत स्वतंत्र करण्याचा ध्यास घेतला. ते १९१३ च्या अखेरीस अमेरिकेत गेल्यानंतर “गदर” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेत सामील झाले. हिंदुस्थानात परतल्यानंतर एकाच वेळी कलकत्त्यापासून पेशावरपर्यन्त सशस्त्र उठाव करण्याची योजना आखण्यात आली पण ती अयशस्वी ठरली.
Ras-Bhav-Vichar: रस–भाव–विचार
by Prof. R. P. Kangleभरतमुनींच्या “नाट्यशास्त्र” या संस्कृत ग्रंथातील रससिद्धान्तविषयक अध्याय ६ व ७ चे प्रस्तुत भाषांतर अभिनवभारतीच्या टीकेसह प्रा. र. पं. कंगले, मुंबई यांनी मंडळास करून दिले. रसाची व्याख्या व सविस्तर उपपत्ती भरतमुनीने नाट्यशास्त्रात सांगितली आहे. त्यानंतर झालेल्या नाट्यविषयक व काव्यविषयक शास्त्रग्रंथांमध्ये भरतमुनीचाच कमीजास्त प्रमाणात अनुवाद करून रससिद्धान्त चर्चिला आहे. रसाध्याय ६ व भावव्यंजक अध्याय ७ मिळून नाट्यशास्त्रामध्ये रससिद्धान्ताचे विवेचन केले आहे. सहाव्या रसाध्यायात रस, भाव इत्यादी नाट्याची अकरा अंगे व त्या प्रत्येक अंगाचे भेद यांचा नामनिर्देश करून पुढे शृंगार, हास्य इत्यादी आठ रसांचे स्थायिभाव, विभाव, अनुभाव आणि व्यभिचारिभाव यांचे विवेचन केले आहे. सातव्या अध्यायात प्रथम भाव, विभाव व अनुभाव यांच्या स्वरूपाचे विवेचन असून नंतर स्थायिभाव, व्यभिचारिभाव यांचे विवेचन आहे.
Moghal Samrajyacha Rhas: मोगल साम्राज्याचा ऱ्हास
by Sir Jadunath Sarkar‘मोगल साम्राज्याचा ऱ्हास’ हे पुस्तक थोर इतिहास-संशोधक सर जदुनाथ सरकार यांनी लिहिलेले. या पुस्तकाचे एकूण चार भाग आहेत. त्यांतील तिसऱ्या भागातील मजकुराचा हा मराठी अवतार. मुगल साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे व मीमांसा करताना या महान संशोधकाने शब्दशः हजारो हस्तलिखिते वाचली, अज्ञात कागदपत्रे चाळली व हा थोर ग्रंथ लिहिला. मराठीत अनुवाद केलेल्या या तिसऱ्या भागात २६ ते ३७ अशी एकूण बारा प्रकरणे आहेत.
Asara: आसरा
by Shree. Vidyadhar Bhaskar Ujgareसामाजिक प्रश्नावर भारतीय पार्श्वभूमीला धरून आणि मराठी भाषेत फार थोडे वाङ्मय उपलब्ध आहे. समाजकल्याण क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला यापुढे समाजसेवेचे शास्त्र शिकणे आवश्यक होणार आहे. अशा शिक्षणासाठी लागणारी वाङ्मय संपदा हेही समाज सेवेंचे नवे क्षेत्र आहे. या क्षेत्रात व विशेष करून या विषयात यापूर्वी माझे स्नेही श्री. शरदचंद्र गोखले यांनी बहुमोल भर घातली आहे. या परंपरेतच वाटचाल करून श्री. विद्याधर उजगरे यांनी “आसरा” हे जे भिकाऱ्यांच्या प्रश्नावर पुस्तक लिहिले त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. ह्या पुस्तकात त्यांनी भिक्षा प्रतिबंधक कायद्याचे सविस्तर विवेचन करून या शिवाय भिकारी पकडल्यापासून त्याच्या पुनर्वसनापर्यंत घडणारी प्रक्रिया तपशीलाने सांगितली आहे. या खेरीज प्रशासन तंत्र आणि व्यक्तिकार्य वगैरे तंत्राचाही उहापोह त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे संस्थांची सूचीव आवश्यक ती आकडेवारी त्यांनी या पुस्तकात दिली आहे.
Hyderabadcha Svatantrya sangrama: हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम
by Shankarbhai Patelश्री. शंकरभाई पटेल आज हा ग्रंथ प्रकाशित होत असताना हयात नाहीत याबद्दल हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणेच मंडळाच्या सदस्यांनाही अत्यंत दुःख होत आहे. शंकरभाईंच्या या आठवणी म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा समग्र विश्वसनीय इतिहास आहे असे समजण्याचे कारण नाही. या लढ्यातील ज्या घटनांशी शंकरभाईंचा प्रत्यक्ष संबंध आला त्यांच्याबद्दल तपशीलवार साक्ष देण्यावर शंकरभाईंचा जास्त भर आहे. ते स्वतः या लढ्यात सहभागी झालेले असल्यामुळे विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिणे साहजिक होते. स्वातंत्र्यलढ्याविषयी कुतूहल असलेल्या सर्वसामान्य वाचकाला त्याचप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासकांना एक महत्त्वाचे साधन म्हणून हा ग्रंथ उपयुक्त ठरेले आहे.