- Table View
- List View
Digital Bharat: डिजिटल भारत
by Dr Deepak Shikarpurपंचवीस वर्षांनी माहिती तंत्रज्ञानाची गंगा म्हणजेच 'आयटी' भारतात वाहत आहे आणि ती सर्वसामान्य नागरिकांसाठी वास्तव बनली आहे. अंगणी येऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. मुळात ही संगणकीय क्रांती असली तरी, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (किमान साधे मोबाइल फोन) आल्यापासून त्याचा खरा प्रसार (आणि परिणाम) जाणवू लागला आहे. आपली बरीचशी सरकारी कामे ऑनलाइन होऊ लागली आहेत! किमान बिले भरणे, एखाद्या प्रकरणाची माहिती घेणे, तक्रारी दाखल करणे, संबंधित कार्यालयात पोहोचणे आणि तिथल्या विभागाचा शोध घेणे आणि योग्य अधिकाऱ्याची वाट पाहणे यासारख्या मूलभूत कामांसाठी शहरी-निमशहरी भागातही तासनतास वाया जातात. आणि जतन केलेले मानसिक आणि शारीरिक श्रम (सामाजिक, आर्थिक, आत्म-सुधारणा इ.) इतरत्र वापरा. काही हरकत नाही! आणि हे अगदी घरी केले जाऊ शकते. थोडे कौशल्य आत्मसात केले तर अनेकांना त्यात दूरगामी करिअरच्या (कमाईच्या) संधी मिळतील. इंटरनेट, कनेक्टेड कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन आणि स्वत:चे बँक खाते यांच्या मदतीने - अगदी गृहिणी देखील तिच्या घरातील आरामात पैसे कमवू शकते. एकदा तुम्ही डिजिटल कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवल्यानंतर, तुम्ही अनेक व्यावहारिक, परस्पर पैलू हाताळण्यास सक्षम असाल. "खरीच कर लो दुनिया मुटका" हे स्वप्न आता सहज शक्य झाले आहे.
Shivram: शिवराम
by Narayan Dharapवकीलांचा सेहेचाळीस-सत्तेचाळीस वर्षांचा मुलगा अपघातात मरण पावला होता. सूनबाई नोकरी करीत होती. घरात जोगळेकरांची पत्नी, सोळा वर्षांचा नातू आणि अठरा वर्षांची नात होती. चोवीस तास घरात राहून घरातलं सर्व काम करणारी बाई त्याना हवी होती. स्वत:चा बंगला होता. कामवालीला रहायला अंगणात खोली होती. पहिल्या भेटीतच वकीलाना ताराचा नीटनेटकेपणा, आटोपशीरपणा, चुणचुणीतपणा पसंत पडला. तिची आईही बरोबर आहे हे समजताच तर त्यानी पहिल्या भेटीतच त्या दोघींचं काम पक्कं केलं, आणि तारा-चंद्राबाई अंगणातल्या मागच्या खोलीत रहायला आल्या. एक वरचं पाऊल, ताराला वाटलं. या मायलेकी वकीलाना एकदम पसंत पडल्या होत्या. नाहीतर आजकाल कामवालीचा नवरा, मुलगा, भाऊ, व्यसनी, दारूडे असले तर त्यांच्यापासून मालकाना किती त्रास होतो याची अनेक उदाहरणं त्यानी प्रत्यक्षच पाहिली होती. खेडेगावातनं आल्याचं ताराने पहिल्याच भेटीत सांगितलं होतं. साधा कुकर, प्रेशर कुकर, वॉशिंग मशिन, रेफ्रीजरेटर, पंखे, रुम कुलर, मिक्सर ग्राइंडर या वस्तू आजकाल बहुतेक सर्वत्र असतातच-फक्त ताराने त्या कधी पाहिल्याही नव्हत्या-पण त्या कशा वापरायच्या हे शिकायची तिची तयारी होती. थोरली अनिता तर जवळ जवळ तिच्याच वयाची होती. मुख्य म्हणजे ताराच्या मनात या लोकांसंबंधी कोणतीही असूया नव्हती. ती काही कायमची यांच्या घरची नोकर राहाणार नव्हती ही तिने मनाशी अगदी पक्की खूणगाठ बांधली होती. आधुनिक आयुष्यातल्या या नव्या नव्या सोयी सुविधांचं शिक्षण आपल्याला अनायासेच मिळतं आहे-ते का न घ्यावं ? नाहीतर अशा पाच-सात-दहा-पंधरा हजार रुपये किंमतीच्या वस्तूना तिला कोणी हात तरी लावू दिला असता का?
Dalit Sahitya Ek Aakalan TYBA Third Semester - RTMNU: दलित साहित्य: एक आकलन बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Balkrushna Kavathekarप्रस्तुत दलित साहित्य एक आकलन पुस्तक म्हणजे दलित साहित्याचा इतिहास नव्हे. विशिष्ट कालखंडात निर्माण झालेल्या सर्वच्या सर्व दलित साहित्यकृतींचा आढावा घेणे, हेही या पुस्तकाचे उद्दिष्ट नाही. दलित साहित्यिकांनी आणि साहित्यविशमर्शकांनी दलित साहित्यविषयी मांडलेल्या विविध भूमिकांचा परामर्श घेऊन त्याविषयी आपली भूमिका मांडणे आणि तिच्या अनुषंगाने प्रमुख दलित साहित्यिकांनी केलेल्या साहित्यनिर्मितीचा विचार करणे हे पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. फार पूर्वीपासून दलित लेखक साहित्यनिर्मिती करीत आलेले असले तरी दलित साहित्य या संज्ञेचा वापर आणि दलित साहित्याची चळवळ यांची सुरुवात मात्र १९६० नंतरच झाली असे दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने जागृत झालेल्या दलित आत्मभानाने केलेल्या लेखनातूनच दलित साहित्याच्या चळवळीचा प्रारंभ झाला. ज्यांच्या साहित्यनिर्मितीमुळे ही चळवळ सुरू झाली, प्रतिष्ठा पावली आणि या चळवळीमुळेच जे लेखनाला प्रवृत्त झाले. अशा काही लक्षणीय दलित साहित्यिकांच्या साहित्यनिर्मितीचाच विचार या पुस्तकात केला आहे.
Majet Shikuya Marathi Class 1 - Maharashtra Board: मजेत शिकूया मराठी इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमहाराष्ट्र शासनाने राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह सर्व अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा धोरणात्मक निर्णय सन २००९ मध्ये घेतला. 'प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२' मध्येही याच धोरणानुसार, अनिवार्य मराठी हा विषय इयत्ता पहिलीपासून समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता पहिली व दुसरीच्या स्तरावर मराठी हा विषय शिक्षकांनी श्रवण, भाषण व संभाषण या कौशल्यांच्या स्वरूपात शिकवावा आणि त्या विषयासाठी 'पाठ्यपुस्तक' असू नये अशी अपेक्षा आहे; म्हणून इयत्ता पहिलीकरिता मराठी विषयाची ही छोटेखानी पूरक साहित्य पुस्तिका पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केली आहे. या पूरक पुस्तिकेमध्ये गाणी, गोष्टी दिल्या आहेत. तसेच परिचित, अपरिचित पक्षी, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, फुले, फळे, झाडे यांचा रंगीत चित्रे व शब्दांतून परिचय करून दिलेला आहे. काही सूचना व कृती दिल्या आहेत. शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ जावे यासाठी पुस्तिकेच्या शेवटी 'दिशा अध्ययन-अध्यापनाची' या शीर्षकाखाली मार्गदर्शन केले आहे. मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन परिणामकारक व दर्जेदार होण्यासाठी त्याचा उपयोग करावा.
The Art Of War: दी आर्ट ऑफ वॉर
by Sun Tzu Vyanktesh Upadhye‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक इ.स पू. 515 मध्ये लौकिकार्थाने फारशा प्रसिद्ध नसलेल्या, सन त्झु नावाच्या एका चिनी पंडिताने लिहिले आहे. या पुस्तकाचे शीर्षक वाचल्यास हे पुस्तक युद्धात वापरायच्या डावपेचांबद्दल आहे, असे वरकरणी वाटते. खरेतर यात संघर्षाबद्दल केलेल्या चर्चेपेक्षा बुद्धिमत्तेबद्दल जास्त ऊहापोह केला आहे. या पुस्तकातील डावपेच, युद्धातील परिस्थितीबरोबरच इतर पार्श्वभूमीवर व युद्धेतर परिस्थितीतदेखील परिणामकारक सिद्ध होतात. इतरांशी असलेल्या संघर्षामुळे वा अंतर्द्वद्वामुळे आपले आयुष्य कसे झाकोळले जाणार नाही याचा मार्ग दाखविणारे, आध्यात्मिक बैठक असलेले असे छोटेखानी तेरा धडे या पुस्तकात आहेत. आध्यात्मिकतेचा कोणताही मार्ग तुम्ही अनुसरत असाल किंवा नसाल तरीही सन त्झु याची ही प्राचीन विचारसरणी प्रत्येकास एकसारखीच लागू आहे. तुमच्या तीव्र स्पर्धात्मक जीवनात संघर्ष हाताळण्याचा परिणामकारक, आध्यात्मिक व सहानुभूतिपूर्ण मार्ग शिकायचा असेल, जीवनातील ध्येयाची स्पष्ट अनुभूती करून घ्यायची असेल व अत्यंत बिकट परिस्थितीतही मनःशांती अनुभवायची असेल तर ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
Antararashtriya Sambandh 1 TYBA Sixth Semester - RTMNU: आंतरराष्ट्रीय संबंध 1 बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Shaikh Hashim Dr Jogendra Gawaiराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. राज्यशास्त्राकरिता सेमिस्टर प्रणालीनुसार संशोधित अभ्यासक्रम लागू केला आहे. या क्रमात राज्यशास्त्राच्या बी.ए. तृतीय वर्ष - सेमिस्टर VI च्या अभ्यासक्रमासाठी 'आंतरराष्ट्रीय संबंध' हा विषय निवडला आहे. प्रस्तुत पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आणि विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या 'राजकीय सिद्धांत', 'पाश्चात्य राजकीय विचार', 'भारताचे शासन व राजकारण', 'राज्यांचे शासन आणि राजकारण', 'तुलनात्मक शासन आणि राजकारण' या अनुक्रमे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिला आहे. प्रस्तुत पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी जास्तीची पुस्तके चाळण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने पुस्तकातील प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा प्रणाली अनुसार पुरेसे वस्तुनिष्ठ प्रश्नही यात दिले आहेत.
Purna Mayechi Lekar TYBA - RTMNU: पूर्णा मायचीं लेंकरं बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Gopal Nilkanth Dandekarगो. नी. दाण्डेकरांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मितीतील वेगळेपणाने उठून दिसणारी कादंबरी-पूर्णामायची लेकरं. वर्हाडातील ग्रामीण लोकजीवनाचे वास्तव प्रत्ययकारी चित्र या कादंबरीत उमटले आहे. वर्हादातील परतवाडा ही दाण्डेकरांची जन्मभूमी. त्यांचं संस्कारक्षम बालपण वर्हाडात गेलं. तरुण वयात त्यांनी अवघं वर्हाड पायांखाली घातलं. तिथल्या ग्रामीण जीवनाची, निसर्गाची अमिट प्रतिमा त्यांच्या अंतर्मनावर उमटली. १९५६ मध्ये त्या प्रतिमेला कादंबरीरूप मिळालं. बयिराम ढोमने हा सांसारिक चिंतांनी ग्रासलेला, भोळाभाबडा शेतकरी. त्याचं कुटुंब आणि त्याचा भवताल या कादंबरीत केंद्रस्थानी आहेत. वर्हाडी ग्रामजीवनातील जनसामान्यांचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. रेखीव व्यक्तिचित्रे, चित्रदर्शी प्रसंगवर्णने, मार्मिक समूहचित्रे, जिवंत, प्रवाही लयबध्द मधुर वर्हाडी बोलीभाषा, दृश्यप्रधान शैली अशा लेखणीच्या गुणधर्मामुळे ही कादंबरी त्यांच्या साहित्यसमारंभात वेधक ठरते. कारुण्यगर्भ नर्म विनोद हे ‘पूर्णमायची लेकरं’ या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य.
Arthashastra class 12 - Maharashtra Board: अर्थशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneअर्थशास्त्र इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांची निर्मिती असलेल्या अर्थशास्त्राच्या ह्या पुस्तकात सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या दोन्हींचा परामर्ष घेण्यात आला आहे. उपयोगिता, मागणी, पुरवठा यांचे सिद्धांत, बाजारांचे प्रकार इत्यादी सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पनांचे विस्तृत विवेचन केले आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार, भारतातील नाणेबाजार व भांडवल बाजार, विदेशी व्यापार ह्या स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना या अभ्यासक्रमात प्रथमच विद्यार्थ्यांसमोर ठेवत आहोत. महत्त्वपूर्ण बदल म्हणजे संख्याशास्त्रातील निर्देशांक मापकाचा ह्या अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे.
Gomant Bharati Pustak Dusare Tritiy Bhasha-Marathi class 9 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक दुसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता नववी - गोवा बोर्ड
by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandalइयत्ता नववीसाठी गोमंत भारती पुस्तक दुसरे (मराठी तृतीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग आणि आधुनिक काव्य विभाग असे तीन विभाग आहेत.
Gomant Bharati Pushpa Pachave Dviteey Bhasha-Marathi class 12 - Goa Board: गोमंत भारती पुष्प पंचम दुसरी भास-मराठी मानक बारावो - गोवा बोर्ड
by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandalइयत्ता बारावीसाठी गोमंत भारती पुष्प पाचवे (मराठी द्वितीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. त्यामुळे स्थानिक सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक वारसा, लोककथा, वैज्ञानिक दृष्टीकोन, निसर्ग जागृती आणि इतर शैक्षणिक उद्दिष्टे लक्षात घेऊन या पुस्तकातील गद्य आणि पद्य साहित्य निवडण्यात आले आहे. गद्य शैलीची ओळख करून देण्यासाठी धड्यांमध्ये पथनाट्य आणि मुलाखती समाविष्ट आहेत.
The Darker Side: द डार्कर साईड
by Cody McFadyenअमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (...की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो. एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ. बी. आय. ची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा! लीसा रीडच्या खुन्याचा तपास एजंट बॅरेटच्या हाताखाली चालू असतो, तोच रोझमेरीच्या खुनाची बातमी येते आणि समोर येते, एक काळीकुट्ट खुनांची मालिका…
Deception Point: डिसेप्शन पॉईंट
by Dan Brownआर्क्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणाऱ्या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची. ३०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली, विमाने आली, हत्यासत्र सुरू झाले. तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली. सत्य उघडकीस आले तर? उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न. दा विंची कोड व एंजल्स ॲण्ड डेमन्स यानंतर डॅन ब्राऊन लेखकाची या दोन्हीवर वरताण करणारी थरारक कादंबरी. अद्ययावत तंत्रज्ञान, राजकारण आणि वैज्ञानिक मागोवा यात ढवळून गेलेली अमेरिका. हा सारा चित्तवेधी प्रकार श्री. अशोक पाध्ये यांनी मराठीत आणला आहे.
Portuguese Maratha Sambandh: पोर्तुगीज मराठा संबंध
by Sadashiv Shankar Desaiपोर्तुगाल ही हिंदुस्थानच्या जलमार्गाचा शोध लावणारी पहिली युरोपियन सत्ता. तथापि पोर्तुगीजांच्या पूर्वी अरब प्रवासी आणि व्यापारी हिंदुस्थानात जलमार्गाने व खुष्कीच्या मार्गाने येत असत. मध्ययुगीन कालात अरब व्यापाऱ्यानी आणि विचारवंतानी भारतीय माल आणि भारतीय तत्वज्ञान आफ्रिका मार्गे युरोपात पोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. योगायोगाची किंवा दुर्दैवाची गोष्ट ही की, पोर्तुगीज नावाड्याना हिंदी महासागरात आणि पर्यायाने हिंदुस्थानच्या समुद्रात आणून सोडण्यास अरबच कारणीभूत ठरले. असे सांगतात की, पोर्तुगीज लोकानी हिंदुस्थानच्या सुवर्णभूमीच्या अद्भूतरम्य कथा कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. त्यामुळे सोन्याचा धूर वाहात असलेल्या ह्या समृद्ध देशात जाऊन तेथील धनसंपत्ती लुटून आणून आपला गरीब देश श्रीमंत करावा, ह्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन ते हिंदुस्थानच्या शोधार्थ बाहेर पडले. आता हा मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामधील संबंधाचा इतिहास प्रकाशात येत आहे.
Gandhi Parv: गांधी पर्व
by T. V. Parvateमहाराष्ट्राच्या आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एक नवीन पर्व सुरु केले. १ ऑगस्ट, १९२० ला लोकमान्य टिळकांचे निधन झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीची धुरा महात्मा गांधीजींच्या खांद्यावर आली आणि ३० जानेवारी, १९४८ ला त्यांची हत्त्या होईपर्यंत ते राष्ट्राचे एकमेव असे नेते राहिले. त्यांच्या हयातीतच सामुदायिक असहकाराची चळवळ, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो इत्यादी चळवळी झाल्या. आणि शेवटी त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीनी केवळ राजकीय चळवळी केल्या नाहीत तर सामाजिक चळवळीही फार मोठ्या प्रमाणात करण्याचे श्रेय त्यांचे आहे. चरखा संघ, ग्रामोद्योग संघटना, कुष्ठरोग निवारणाची चळवळ इत्यादी अनेक विधायक चळवळी पण त्यांनी सुरु केल्या.
Dharmarahasya: धर्मरहस्य
by Dr K. L. Daptari‘धर्मरहस्य’ हा निबंध हिंदुधर्माचा बुद्धिवादी पद्धतीने काढलेला उत्कृष्ट निष्कर्ष आहे. मानवी बुद्धि स्वतंत्र रीतीने ज्या पारलौकिक अतींद्रिय तत्त्वांचे किंवा सिद्धांतांचे आकलन करू शकत नाही अशा अमरत्व, ईश्वर, पुनर्जन्म, दिव्यदृष्टी इत्यादि तत्त्वांचा वा सिद्धान्तांचा अंगीकार न करता मानवी बुद्धीस समजू शकेल व पटू शकेल अशा हिंदुधर्मीय सिद्धान्तांची सुसंगत तर्कशुद्ध रचना या पुस्तकात केलेली आढळते. वेद, स्मृति व पुराणे या हिंदुधर्मशास्त्राच्या व धर्मेतिहासाच्या ग्रंथांचे दीर्घकालपर्यंत परिशीलन करून त्यांची व्यवस्थित उपपत्ती येथे मांडली आहे. या निबंधात वेद, स्मृती व पुराणे यांची ऐतिहासिक दृष्टीने मीमांसा करून त्यातील निष्कर्ष व्युत्पादिले आहेत. ऐतिहासिक पद्धती व ग्रंथप्रामाण्य पद्धती अशा दोन परस्परविरोधी पद्धती स्वीकारणारे हिंदुधर्म मीमांसकांचे दोन विरोधी संप्रदाय आहेत.
Kadachit Hech Ahe Prem: कदाचित हेच आहे प्रेम
by Abhishek Dalaviही कादंबरी लेखकाकडून लिहली गेलेली पहिली प्रेमकथा आहे. आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक प्रेमकथा होऊन गेल्या आहेत. काहींनी इतिहास बनवला तर काही इतिहासात हरवून गेल्या. आजही प्रेम करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण आपल्या मर्जीने लग्न करायचा अजिबात नाही. आजही कित्येक प्रेमकथा पूर्ण होतात पण काही कायमच्या अपूर्ण राहतात. जास्तीच जास्त प्रेमकथा अपूर्ण राहतात त्या मुला आणि मुलीकडील घरच्यांच्या नकारामुळे. या घरच्या मंडळींची नकार देण्याची कारणसुद्धा अगदी अफलातून असतात बरं. काही कुटुंबाना मुलगा देखणा हवा तर काहींना मुलगी कमावणारी हवी, काहींना मुलगी आपल्या जातीतली हवी तर काहींना मुलगा दुसऱ्या कुळातला हवा, काही सुनेकडे हुंडा मागतात तर काही जावयाला घरजावई बनवण्याचा हट्ट करतात. काहीवेळा मूलाकडच्यांचा होकार असतो तर मुलींकडच्यांचा नकार असतो. काही वेळा मुलीकडच्यांचा होकार असतो तर मूलाकडच्यांचा नकार असतो आणि जर दोघांकडूनही होकार असेल तर तो नकारात बदलायला कुंडलीचा दोष पुरेसा असतो. लेखकाच्या मते कोणावर जीवापाड प्रेम केल्यानंतर फक्त घरच्यांच्या हट्टापोटी त्यासोबत नात तोडून टाकणं, त्या पासून कायमच दूर निघून जाण, त्याला विसरून जाण या पेक्षा मोठं दुःख या जगात असूच शकत नाही. लेखकाची ही कथाही अशाच दोन पात्रांशी निगडित आहे. ज्यांची कुटुंब, शहर, रस्ते एकमेकांपासून फार दूर आहेत. पण त्याचं प्रेम, आकांशा आणि नशीब त्यांना त्यांचं आयुष्य एकत्र जगण्यासाठी मदत करत. आता त्यांचं आयुष्य म्हणजे नियतीचा मेळ आहे, नशिबाचा खेळ आहे मी प्रेमाचे फळ हे ही कादंबरी वाचून तुम्हीच ठरवा.
Pashchatya Rog Chikitsa Khand 2: पाश्चात्य रोग चिकित्सा खंड २
by Dr G. E. Bommaडॉ. जी. ई. बोमाँ लिखित “Medicine: Essentials For Practitioners and Students” या ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉ. मधुकर रानडे, मुंबई यांनी ग्रंथविषयाची माहिती मूळ ग्रंथकाराप्रमाणेच देऊन पण मराठी भाषेच्या प्रकृतीशी मेळ बसेल अशारीतीने केला आहे. तसेच डॉ. बोमाँ यांच्या मूळ ग्रंथातील मूलभूत वैद्यकविज्ञान मराठी भाषांतरात कायम ठेवले असून भारतीय संदर्भात मूळ ग्रंथाचा विषय नीट स्पष्ट करण्यासाठी डॉ. रानडे यांनी, मूळ प्रकाशकांच्या परवानगीने, सदर भाषांतरात आवश्यक ते बदल केले आहेत.
Maharashtrache Shilpkar Vasantdada: महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा
by Raja Maneवसंतदादांचा जीवनकार्यकाल हा देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांतील परिवर्तनाचा काळ होता. त्या परिवर्तनाला सामोरे जाताना समाजहित आणि बदलत्या काळाची मागणी यांची अचूक सांगड घालून भविष्याचा वेध घेणे, हे खूप मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यात ते यशस्वी झाले आणि म्हणूनच लोकांच्या हृदयसिंहासनावर ‘दादा’ ही उपाधी प्राप्त करून ते राज्य करू शकले.
Reward: रिवार्ड
by Baba Kadamमराठीतील लोकप्रिय लेखक बाबा कदम यांची गाजलेली कादंबरी Reward. उत्कंठावर्धक नाट्यने भरलेली कादंबरी.एक दिवस असा भयानक उजाडला, की तळाशी हे गाव धरणीकंप झाल्यासारखं हादरलं. गेल्या कित्येक वर्षांत या भागात जे घडलं नाही, ते घडलं! त्या दिवशी खून झाला आणि तोही तातोबाचा.त्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास गुराख्याची मुलं माथाडीजवळ जनावरांना पाण्यावर घेऊन गेली होती. त्यांना अचानक ठो… ठो…ऽऽऽ असा आवाज आल्यामुळं भयभीत होऊन त्यांनी इकडंतिकडं पाहिलं, तर समोरून उंबराच्या झाडामागून तातोबा वेड्यासारखा धावत त्यांच्यासमोर आला आणि धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या गालातून आरपार अशी बंदुकीची गोळी गेली होती आणि त्याची संपूर्ण जीभ तुटली होती. ओठ आणि नाकपुड्या रक्तानं माखलेल्या होत्या.
Gandhi: गांधी: कार्य व विचारप्रणाली
by Prof. Bhaskar Ramchandra Bapatगांधी आणि माओ या आधुनिक काळातील दोन अलौकिक क्रांतिकारक व्यक्ती होत. ‘पॉवर ग्रोज आउट ऑफ द बॅरल ऑफ ए गन’ असे म्हणणाऱ्या माओचे गांधींशी काय साम्य असे प्रथमतः वाटते. वरील वचनामध्ये माओ शासनसत्तेविषयी विलक्षण जागरूकता दाखवितो; समाजिक व्यवहारात सत्ता कोणाच्या हाती आहे हा मोक्याचा प्रश्न असतो हे स्पष्ट करतो. गांधी अराज्यवादी म्हणून ओळखले जातात.
Vatchal: वाटचाल
by Nana Kunteही वाटचाल आहे माझ्या सार्वजनिक जीवनाचा मी स्वतः काढलेला आलेख. दर्यासारंग आंग्रे घराण्याची राजधानी, कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण अशा मोठ्या बिरुदांनी आमचे अलिबाग बाह्य जगाला परिचित असले तरी प्रत्यक्षात आजही त्याची लोकसंख्या दहा हजारांपलीकडे फारशी गेलेली नाही. अशा गावात माझे मॅट्रिकपर्यंतचे आयुष्य गेले. रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी अलिबागजवळच्या नागाव या अष्टागरातील एका प्रमुख गावी आल्यापासून फक्त शेती-बागायती करणाऱ्या, पोटापुरते मिळविणाऱ्या शेतकरी कुटुंबातील नव्याने वकील झालेल्याचा मी मुलगा. एकत्र कुटुंब, प्रमुख व्यवसाय शेती-बागायत. अष्टागरातील शेतकरी कोणत्याही जातीचा असो, आपल्या शेतात, वाडीत स्वतः राबणारा आणि त्यात धन्यता मानणारा. आपले प्रौढ जीवन सार्वजनिक कामात घालवावे असे मला लहानपणापासून वाटत आलेले आहे. शिवाजीच्या मावळ्यांप्रमाणे स्वराज्याकरिता झटण्याचे आकर्षण. इतिहासात शिवाजीने आणि माझ्या बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घालून दिलेला धडा गिरवावा अशी स्वप्ने मी पाहात असे. प्रभू रामापेक्षा हनुमान किंवा शिवाजीपेक्षा तानाजीच मला जास्त आवडे. नाथमाधवांचा ‘सावळ्या तांडेल’ पुस्तकरूपाने आणि शिवरामपंत परांजप्यांची ‘गोविंदाची गोष्ट’ चित्रमयजगत् या मासिकात वाचलेली.
Bhartiya Musalman: भारतीय मुसलमान
by Shree Vasant Nagarkarप्रा. मुजीब लिखित "The Indian Muslims" या पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद भारतीय मुसलमान हा आहे. ब्रिटिश अमदानीत आणि त्यानंतर जे इतिहास लिहिले गेले त्यांनाही हा नियम लागू आहे. अशा प्रकारच्या इतिहासांची किंवा विशिष्ट ऐतिहासिक घटना अथवा प्रश्न यावर लिहिल्या गेलेल्या प्रबंधांची सर्वसामान्य चर्चा करणे येथे अप्रस्तुत होईल. हा ग्रंथ हिंदी मुसलमानांवर लिहिलेला असल्यामुळे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. तुरळक अपवाद वगळता मुसलमान इतिहासकारांनी निष्पक्षदृष्टी ठेवलेली दिसत नाही. त्यामुळे आजवर मुसलमान समाजाचे व्यक्तिमत्व, त्यांचे प्रश्न आणि यशापयश यांचे संपूर्ण आकलन होऊ शकलेले नाही. प्रस्तुत ग्रंथाची मोठी व्याप्ति पाहता उपलब्ध साधनांचा साकल्याने अभ्यास करणे आवश्यक असूनही ते लेखकाच्या आवाक्याबाहेरचे काम होते.
Islamachi Samajik Rachana: इस्लामची सामाजिक रचना
by Shreepad Kelkarहर्बर्ट स्पेन्सर यांच्या ‘ड्रिस्क्रिप्टिव्ह सोशिऑलॉजी’ च्या सूत्रानुसार पुढील संशोधन म्हणून हा ग्रंथ हर्बर्ट स्पेन्सर ट्रस्टीजच्या विनंतीवरून प्रथम लिहिण्यात आला. सर्व जगातील मुस्लिम समाजाची समान धार्मिक श्रद्धेतून उद्भवलेली अशी जी काही समान वैशिष्ट्ये आहेत ती एक संपूर्ण विषय म्हणून अभ्यासण्याजोगी आहेत. इस्लाम धर्म मानणाऱ्या समाजांची जीवनपद्धती व रचना यांच्यावर इस्लाम धर्माचा किती व कसा प्रभाव पडलेला आहे याचा शोध घेणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे दोन खंड अनुक्रमे १९३१ व १९३३ मध्ये ‘सोशिऑलॉजी ऑफ इस्लाम’ या नावाने प्रकाशित झाले. त्यानंतर परिस्थितीत झालेल्या परिवर्तनाच्या संदर्भात पहिल्या आवृत्तीमधील माहितींत जरूर त्या सुधारणा हे पुस्तक लिहिताना केल्या आहेत.
Boomrang Bhag-1: बूमरँग भाग-१
by Baba Kadamमराठी साहित्यातील लोकप्रिय आणि जेष्ठ कादंबरीकार बाबा कदम यांची प्रचंड गाजलेली कादंबरी बूमरॅंग.. तिचा हा पहिला भाग... बूमरँग एक असे शस्त्र जे फेकले कि परत आपल्याकडेच येते, तशाच आयुष्यातील काही प्रसंग, घटना, आपली कर्म उलटून आपल्यावरच येऊ शकतात. एक उत्कंठावर्धक नाट्यपूर्ण कादंबरी चा पहिला भाग.
Samajik Vaad: सामाजिक वाद
by Vinayak Sitaram Sarwateआज त्या जगापुढें सर्वांत महत्त्वाचा प्रश्न कामकरीवर्गाचा आहे. तिकडे हा वर्ग अठराव्या शतकांत यांत्रिक कारखान्यांच्या उत्पत्तीनंतर अस्तित्वांत आला. पहिल्यापासूनच त्याची स्थिति परवश, जुलुमानें गांजलेले, दीन, दरिद्री व कष्टमय राहत आली. शिक्षणाच्या व जागृताच्या अभावी त्यानें ती बरीच वर्षे निमूटपणें सहन केली. या पुस्तकांत सामाजिक वादाचा इतिहास देण्याचाच उद्देश असल्यानें, त्या वादांत अगदीं प्रारंभापासून आतांपावतों होत आलेल्या निरनिराळ्या रुपांतरांचें व मतांतराचें केवळ विवेचन मात्र यांत करण्यांत आलें आहे. या मतांवर घेतले जाणाऱ्या आक्षेपांचा किंवा त्यांना देण्यांत येणाऱ्या उत्तरांचा यांत विचार केलेला नाहीं.