Browse Results

Showing 51 through 75 of 1,427 results

Manasashastrachi Payabharani FYBA First Semester - SPPU: मानसशास्त्राची पायाभरणी एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. या अभ्यास क्रमावर आधारित हे पाठ्यपुस्तक आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणांनुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. या वर्षीपासून एक महत्त्वाचा बदल अभ्यासक्रमात झाला आहे तो म्हणजे Choice Based Credit System-CBCS ज्यात सत्रानुसार मूल्यांकन होणार आहे.

Prarambhik Bharat Pragaitihasik Kaal Te Mauryakal FYBA First Semester - SPPU: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Prarambhik Bharat: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Samajshastracha Parichay Paper 1 FYBA First Semester - SPPU: समाजशास्त्राचा परिचय पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Gagangras Prof. Dr. Sudhir Yevale

समाजशास्त्र अभ्यास मंडळाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाची निवड करताना खूप कष्ट व काळजी घेतलेली दिसते. मागील अभ्यासक्रमातील कालबाह्य बाबी काढून टाकून समकालीन सामाजिक बदलांचा विचार करूनच या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. सेठ/नेटसारख्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा व इतर समाजशास्त्र विषय निवडून ज्या काही व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना आहेत त्यासाठी त्यांचा प्रवास सुकर व्हावा हाही या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे. समाजशास्त्रातील वाढत्या संधी, संशोधन, आर्थिक, शिक्षण, कायदा, पत्रकारिता, औद्योगिक, राजकीय, सामाजिक यांतील समकालीन मुद्द्यांना या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. कुटुंब, नातेसंबंध याचे बदलते स्वरूप अधोरेखित करण्याचा प्रयत्नही झाला आहे. शिक्षक व विद्यार्थी यांना आकलन होईल अशा सोप्या व सरळ भाषेत हा अभ्यासक्रम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वापरले जाणारे पर्यायी शब्दही दिले आहेत.

Bhartiya Aarthik Paryavaran FYBA First Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. V. Tele Dr S. R. Pagar

प्रथम वर्ष कला या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तकाचे लिखाण व विविध संकल्पनांची मांडणी करताना अतिशय साधा व सोप्या भाषेचा कटाक्षाने वापर केलेला आहे. प्रत्येक संकल्पना व उपघटक यांच्या आशयाची सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे. उपघटकांचे विश्लेषण करताना अलीकडील आकडेवारीचा संदर्भ केला आहे. पुस्तकाचे लिखाण करताना अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने संदर्भित केलेल्या संदर्भ ग्रंथांबरोबरच इतर अनेक दर्जेदार संदर्भ ग्रंथांचा आवर्जून वापर केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने नमूद केलेल्या आकृतिबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत.

Bhartiya Sanvidhanacha Parichay Paper 1 FYBA First Semester - SPPU: भारतीय संविधानाचा परिचय पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Bidlan Dr Pradip Deshpande Dr Pramod Tambe Dr Minal Kshirsagar

एफ.वाय.बी.ए. राज्यशास्त्र जनरल पेपर-1 या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित भारतीय संविधान परिचय सत्र-1 पुस्तक आहे. भारतीय संविधान परिचय यावर आधारित अनेक ग्रंथ, पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सदर अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास, संविधान सभेचे कार्य, भारतीय संविधानाची प्रस्तावना व त्यातील महत्त्वाची तत्त्वे यांची ओळख, भारतीय संविधानाची वैशिष्टये, मूलभूत अधिकार त्यांची तरतूद व मानवी हक्कांविषयी तोंडओळख होण्याबरोबरच मूलभूत कर्तव्ये व राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्त्वे हे प्राथमिक पातळीवर शिकणार आहोत. राज्या राज्यांमध्ये होणारे विविध संघर्ष, भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे बदल समजण्यासाठी तसेच भारतीय संघराज्याचे स्वरूप, वैशिष्टय त्याचबरोबर संविधान सुधारणांची संविधानामधील तरतूद, संविधान सुधारणा पद्धती, भारतीय संविधानातील मोठ्या संविधान सुधारणा व संविधानाची मूलभूत संरचना या नवीन प्रकरणांची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून करून घेणार आहोत.

Prakrutik Bhugol Paper 1 FYBA First Semester - SPPU: प्राकृतिक भूगोल पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thorat

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेयांक पद्धती व सेमिस्टर पद्धती जून 2019 पासून प्रथम वर्ष कला या वर्गासाठी लागू केल्या आहेत. तसेच प्राकृतिक भूगोल हा पेपर भूगोल विषयाची अत्यंत महत्त्वाची शाखा असून प्राकृतिक भूगोलात भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र व सागरशास्त्र अशा अनेक शाखांचा समावेश केला गेला आहे. पुस्तकातील पहिल्या प्रकरणात प्राकृतिक भूगोल परिभाषा, प्राकृतिक भूगोल स्वरूप आणि व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा व पृथ्वीप्रणालीबद्दल परिचय अत्यंत सूत्रबद्ध व नियोजनपूर्वक मांडल्याने अभ्यासकांना विविध संकल्पना समजण्यास त्याचा फायदा होईल. पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणात मृदावरण अंतर्गत पृथ्वीचे अंतरंग, वेगनरचा भूखंडवहन सिद्धान्त व डेव्हिसची खननचक्र संकल्पना समाविष्ट केली आहे. पुस्तकातील तिसऱ्या वातावरण या प्रकरणात वातावरणाची रचना, उष्णतेचा ताळेबंद, वायुभार पट्टे व वाऱ्याची प्रणाली आणि दृष्टीची रूपे व प्रकार असे घटक घेतले आहेत. पुस्तकातील चौथ्या जलावरण या प्रकरणात जलचक्र, महासागराचे सामान्य स्वरूप, सागरी लाटा व लहरी आणि क्षेत्रभेट (अभ्यास) असे घटक घेतल्याने सागरशास्त्राचा महत्त्वपूर्ण भाग समाविष्ट केलेला दिसून येतो. क्षेत्रभेट (अभ्यास) व क्षेत्रभेटीमुळे विषयाची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Samajshastrachi Olakh FYBA First Semester - SPPU: समाजशास्त्राची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vijay M. Jadhav

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. समाजशास्त्राची ओळख या पुस्तकाच्या सुरूवातीला समाजशास्त्र या विषयाची मूलभूत माहिती, समाजशास्त्रांतर्गत येणारे अभ्यासविषय त्याचप्रमाणे समाजशास्त्राचा उदय, समाजशास्त्रातील विविध क्षेत्रे, समाजशास्त्रातील रोजगारविषयक संधी याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दुसऱ्या प्रकरणात समाज त्याचा अर्थ, व्याख्या, समाजाची वैशिष्ट्ये, समाजाचे स्थल-कालानुसार बदलत गेलेले प्रकार, त्याचप्रमाणे समूह, समूहाची संकल्पना, सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये, समूहाचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच समुदाय आणि सोशल नेटवर्किंग या संकल्पनांची देखील चर्चा प्रस्तुत प्रकरणात केली आहे. पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात संस्कृती, संस्कृतीचे प्रकार यांची देखील सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच सामाजिक स्तरीकरण, स्तरीकरणाची वैशिष्ट्ये, स्तरीकरणाचे आधार, सामाजिक अपवर्जन, सामाजिक असमानता यांची देखील विस्तृत आणि तपशीलवार चर्चा प्रस्तुत प्रकरणात करण्यात आली आहे.

Bharatiya Rajyaghatnechi Olakh FYBA First Semester - SPPU: भारतीय राज्यघटनेची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Eknath Khandve Prof. Dr. Vilas Awari

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (भारतीय राज्यघटनेची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख या पुस्तकाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. भारतीय राज्यघटनेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती आणि भारतातील राज्यघटनेची वैशिष्ट्ये याबाबत तपशीलवार माहिती पुरविण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदींवर प्रकाश टाकण्याचे काम प्रस्तुत पुस्तकाद्वारे पार पाडले आहे. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध आणि केंद्र-राज्य संबंधातील संघर्षाचे मुद्दे याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३६८ अन्वये घटना दुरूस्तीची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकाद्वारे भारतीय राज्यघटनेतील दुरूस्तीची प्रक्रिया व प्रमुख घटनादुरुस्त्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. एकूणच भारतीय राज्यघटनेची मिमांसा करणारे हे एक महत्वपूर्ण पुस्तक आहे.

Poonachi: पूनाची

by Perumal Murugan

एक गूढ पाहुणा कुठूनतरी अवतरतो आणि एक नुकतंच जन्मलेले करडू एका म्हाताऱ्या जोडप्याला भेट देऊन जातो. लवकरच, त्या छोट्याशा काळ्या शेळीचा पूनाचीचा - नाजुकपणा आणि बहुप्रसवता या गोष्टी तिच्या अवतीभवतीच्या सगळ्यांच्या नवलाचा विषय बनून जातात. अगदी तिच्यावर झडप घालू पाहणाऱ्या गरुडापासून ते तिला तोंडात धरून पळवून नेऊ पाहणाऱ्या रानमांजरापर्यंत, सगळ्यांपासून वाचवून म्हातारा-म्हातारी छोट्या पूनाचीला जगवण्यासाठी जिवाचे रान करतात, कारण ती त्यांत्त्या छोट्याशा विश्वाचा केंद्रबिंदू बनून गेलीय. शेतकरी, धनगर किंवा शेळ्या यांच्यापैकी कुणाचही जगणं तसं सोपं नसतंच. पाऊस येत नाही, देव आपापल्या वाटचे बळी मागून मोकळे होतात आणि अरण्य या अजाण प्राण्यांना मोहवून फशी पाडायला टपलंय, या सगळ्यांतून, पूनाची कधी तिचं रक्षण करणाऱ्या तर कधी तिला घायाळ करणाऱ्या, मनुष्यप्राण्यांच्या वर्तणुकीची साक्षीदार होते आणि त्यावर मूक प्रश्नचिन्हही उपस्थित करते. प्राण्यांच्या जगाची ही तरल, तरीही गुंतागुंतीची कथा, हे आपल्या काळावरचं, वर्ण-जातीच्या विषम उतरंडीवरचं भाष्य आहे; तसंच ते भाष्य आहे नाकर्त्या शासनाच्या लहरींना शरण जाण्याऐवजी त्यांच्या विरोधात आवाज उठवण पसंत करणाऱ्या महत्त्वाकांक्षी व्यक्तींच्या वाढत्या असमर्थतवरचं, असुरक्षिततेवरचं.

Sanwad: संवाद

by Achyut Godbole

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, म्हणूनच इतिहासात डोकावून बघितलं तर आदिम काळापासून मनुष्य समूहानं किंवा टोळ्यांनी राहत असलेला बघायला मिळतो. अगदी सुरुवातीला माणलानं एकमेकांशी संवाद कसा साधला असेल? या प्रश्‍नाच्या कुतूहलातूनच अच्युत गोडबोले यांचं ‘संवाद’ हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. ‘संवाद’ या पुस्तकात चित्रलिपीद्वार, खाणाखुणा करून, वेगवेगळे आवाज करुन आदिमानवाच्या परस्परांतल्या संवादाला कशी सुरुवात झाली याचा इतिहास तर आहेच, पण त्याचबरोबर शेतीमुळे स्थैर्य आल्यानंतर माणसाच्या जगण्यात जे बदल झाले, त्यातच त्यानं लावलेला छपाईयंत्राचा शोध असेल किंवा टपालव्यवस्थेचा शोध असेल, या सगळ्या शोधांनी माणसं एकमेकांशी कसा संवाद साधायसा लागली, त्यातून काय गमतीजमती घडत गेल्या, या शोधकर्त्यांना कुठकुठल्या अडचणींना तोंड देत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागलं, त्या त्या काळात तंत्रज्ञान कसं बदलत गेलं, तंत्रज्ञानानं माणसाच्या संवादात काय बदल घडवून आणले, या प्रवासात किती तंत्रज्ञांचा मृत्यू अत्यंत हलाखीत झाळा आणि किती जणांचं आयुष्य प्रचंड वैभवात गेलं, हे सगळं या पुस्तकात बाचकांची उत्कंठा वाढवणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक शोधाचा शोधकर्ता, त्या शोधामागचं तंत्रज्ञानदेखील ‘संवाद’मध्ये अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आदिमानवापासून व्हॉट्सअपच्या युगापर्यंत माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला याविषयीची एक रंजक आणि चित्तथरारक कहाणी म्हणजे ‘संवाद’! यामध्ये शिंग, तुतारी, आगीपासून ते भाषेचा आणि लिपीचा उगम, कागद आणि छपाई यांचे शोध, टपालव्यवस्था, वर्तमानपत्र, मोबाइल फोन, फेसबुक आणि व्हॉट्सअप या सर्वांच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जन्मकथा आपल्याला ‘संवाद’मध्ये खिळवून ठेवतील.

RAW Bhartiya Guptacharsansthechi Goodhgatha - Novel: रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा - कादंबरी

by Ravi Amale

‘रॉ’___ रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ’ची अशी कहाणी. बांग्लादेश मुक्तियुद्धाची आणि पाकीस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवयांना पुरुन उरण्याची. ‘रॉ’ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी समान आणि विरोधी अशी विविध बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरुन चालत असतात ही बले. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तिथे नैतिक-अनैतिकतेचे निकष असतात फोल. तिथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘रॉ’च्या अनेक ज्ञान-अज्ञात अधिकाऱ्यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणास दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गुढ अंतरंगाचे.

Aptavani Shreni-1: आप्तवाणी श्रेणी –१

by Dada Bhagwan

यह संसार किसने बनाया? क्या यह संसार आपके लिए परेशानी का कारण है? क्या आपको आश्चर्य होता है कि यहाँ सबकुछ कैसे होता है? कैसे हम अनगिनित जन्मों में भटक रहे हैं। यह सब करनेवाला कौन है? धर्म क्या है? मोक्ष क्या है? आध्यात्मिकता और धर्म में क्या फर्क है? शुद्ध आत्मा क्या है? मन, शरीर और वाणी के क्या कार्य हैं? लौकिक रिश्तों को कैसे निभाएँ? भाग्य और कर्म का अंतर कैसे समझें? अहंकार क्या है? क्रोध-लोभ-मोह, क्या वे अहंकार के कारण हैं? जिन्हें मोक्ष पाने की इच्छा है या जो मोक्ष चाहते हैं, उनकी ज़िंदगी में ऐसे अनेक प्रश्न व समस्याएँ होगीं। ‘स्वयं’ का ज्ञान या ‘मैं कौन हूँ’ यह सब का अंतिम लक्ष्य है। ‘मैं कौन हूँ’ के ज्ञान बगैर मोक्ष नहीं मिल सकता। यह ज्ञान केवल ज्ञानीपुरुष से ही प्राप्त हो सकता है। इस पुस्तक में ज्ञानीपुरुष परम पूज्य दादाश्री द्वारा दिए गए बहुत सी समस्याओं के उत्तर संकलित हैं। इस दिव्य पुस्तक का ज्ञान उन लोगों के लिए हैं जिनकी वैज्ञानिक सोच है, जिन्हें आत्मिक शांति चाहिए और जो संसार की परेशानियों से मुक्त होना चाहते हैं।

Ahinsa: अहिंसा

by Dada Bhagwan

इन छोटे-छोटे जीवों को मारना, वह द्रव्यहिंसा कहलाता है और किसी को मानसिक दुःख देना, किसी पर क्रोध करना, गुस्सा होना, वह सब भावहिंसा कहलाता है। लोग चाहे जितनी अहिंसा पाले, लेकिन अहिंसा इतनी आसानी से नहीं पाली जा सकती। और वास्तव में क्रोध-मान-माया-लोभ ही हिंसा हैं। द्रव्यहिंसा कुदरत के लिखे अनुसार ही चलती है। इसमें किसी का चले, ऐसा नहीं है। इसलिए भगवान ने तो क्या कहा है कि सबसे पहले, खुद को कषाय नहीं हो, ऐसा करना। क्योंकि ये क्रोध-मान-माया-लोभ, वे सबसे बड़ी हिंसा हैं। द्रव्यहिंसा हो तो भले हो, लेकिन भाव हिंसा नहीं होनी चाहिए। लेकिन लोग तो द्रव्यहिंसा रोकते हैं और भाव हिंसा तो चलती ही रहती है। इसलिए किसी ने निश्चित किया हो कि “मुझे तो मारने ही नहीं हैं” तो भाग्य में कोई मरने नहीं आता। अब वैसे तो उसने स्थूल हिंसा बंद कर दी, कि मुझे किसी जीव को मारना ही नहीं है। लेकिन बुद्धि से मारना, ऐसा निश्चित किया, तो उसका बाज़ार खुला ही रहता है। तब वहाँ कीट पतंगे टकराते रहते हैं। और वह भी हिंसा ही है न! अहिंसा के बारे में इस काल के ज्ञानी, परम पूज्य दादाश्री के श्रीमुख से निकली हुई वाणी, इस ग्रंथ में संकलित की गई है। इसमें हिंसा और अहिंसा – दोनों के तमाम रहस्यों से पर्दा हटाया है।

Guru Shishya: गुरू-शिष्य

by Dada Bhagwan

लौकिक जगात वडील-मुलगा, आई-मुलगी, पती-पत्नी अशी सर्व नाती असतात. त्यापैकी गुरू-शिष्य सुद्धा एक नाजूक नाते आहे. गुरूंना समर्पित झाल्यानंतर संपूर्ण आयुष्य त्यांच्याशी प्रामाणिक राहून परम विनयापर्यंत पोहोचून, गुरूआज्ञेप्रमाणे साधना करून सिद्धी प्राप्त करायची असते. परंतु खऱ्या गुरूची लक्षणे, तसेच खऱ्या शिष्याची लक्षणे कशी असतात याचे सुंदर विवेचन या पुस्तकात प्रस्तुत केले आहे. गुरूजनांसाठी या जगात विविध मान्यता प्रचलित आहेत. तेव्हा अशा काळात यथार्थ गुरू करताना लोक संभ्रमात पडतात. येथे अशाच पेचात टाकणारे प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दादाश्रींनी प्रश्नकत्र्यांना दिली आहेत. सामान्य समजुतीनुसार गुरू, सदगुरू आणि ज्ञानीपुरुष-तिघांना एकसारखेच मानले जाते. जेव्हा की परम पूज्य दादाश्रींनी या तिघांमधील फरक अचूक स्पष्टीकरण देऊन स्पष्ट केला आहे. गुरू आणि शिष्य- दोघांनाही कल्याणाच्या मार्गावर प्रयाण करता येईल यासाठी सर्व दृष्टीकोनातून गुरू-शिष्याच्या नात्याची समज, लघुत्तम असून सुद्धा अभेद, अशा विलक्षण ज्ञानींची वाणी येथे संकलित करण्यात आली आहे.

Prem: प्रेम

by Dada Bhagwan

सच्चा प्रेम हम किसे कहते है? सच्चा प्रेम तो वह होता है जो कभी भी कम या ज़्यादा ना हो और हमेशा एक जैसा बना रहे| हमें लगता है कि हमें हमारे आसपास के सभी लोगो पर बहुत प्रेम है पर जब भी वह हमारे कहे अनुसार कुछ नहीं करते तो हम तुरंत ही बहुत गुस्सा हो जाते है| पूज्य दादाभगवान इसे प्रेम नहीं कहते| वह कहते है कि यह सब तो सिर्फ एक भ्रान्ति ही है| सच्चा प्रेम तो वह होता है जिसमें किसी भी प्रकार कि अपेक्षा नहीं होती और जो सबके साथ हर समय और हर परिस्तिथि में एक जैसा बना रहता है| ऐसा सच्चा प्रेम तो बस एक ज्ञानी ही कर सकते है जिन्हें लोगो में कोई भी भेदभाव मालूम नहीं होता और इसलिए उनका व्यवहार सबके साथ बहुत ही स्नेहपूर्ण होता है| फिर भी हम थोड़ी कोशिश करे तो, ऐसा प्रेम कुछ अंश तक हमारे अंदर भी जगा सकते है| यह सब कैसे संभव है, यह जानने के लिए अवश्य पढ़े यह किताब और अपने जीवन को ‘प्रेममय’ बनाइये|

Nijdosh Darshanane... Nirdosh: निजदोष दर्शनाने... निर्दोष

by Dada Bhagwan

परम पूज्य दादाश्रींचे ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आतील सर्व क्रियांना पाहू शकाल आणि विश्लेषणही करु शकाल. ही समज, पूर्ण ज्ञान अवस्थेपर्यंत पोहचण्यासाठीची सुरुवात आहे. ज्ञानाच्याप्रकाशात तुम्ही विना राग-द्वेष, स्वत:च्या चांगल्या तसेच वाईट विचारांच्या प्रवाहाला पाहू शकाल. तुम्हाला चांगले किंवा वाईट पाहण्याची गरज नाही, कारण विचार परसत्ता आहे. तर मग प्रश्न हा आहे की ज्ञानी या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? तर ज्ञानी जगाला निर्दोष पाहतात. ज्ञानी हे जाणतात की जगातील सर्व क्रिया पूर्वी चार्ज केलेल्याचे डिस्चार्ज आहे. ते हे जाणतात की जग निर्दोष आहे. नोकरीत साहेबांसोबत झालेले भांडण किंवा अपमान, हे केवळ तुमच्या पूर्वी चार्ज केलेल्याचे डिस्चार्ज आहे. साहेब तर फक्त निमित्त आहेत. संपूर्ण जग निर्दोष आहे. ज्या पण काही अडचणी आपल्यावर येतात त्या तर मूळत: आपल्याच चुकांच्या परिणाम स्वरुपात आहेत. त्या सर्व आपल्याच ब्लंडर्स व मिस्टेक्स आहेत. ज्ञानींच्या कृपेने सर्व चुका मिटून जातात. आत्मज्ञान नसलेल्या माणसाला स्वत:च्या चुका न दिसता फक्त दुसऱ्यांच्याच चुका दिसतात. निजदोष दर्शनावर परम पूज्य दादाश्रींची समज, उपाय आणि त्यास जीवनात उतरवण्यासाठीच्या चाव्या या पुस्तकात संकलित केलेल्या आहेत. ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मन, वचन, कायेचा पक्ष घेणे बंद करता आणि निष्पक्षपणे स्वत:च्या चुका स्वत:ला दिसू लागतात, तसेच अंतरशांती लाभण्याची सुरुवात होते.

Klesh rahit jivan: क्लेश रहित जीवन

by Dada Bhagwan

क्या आप जीवन में उठनेवाले क्लेशों से थक चुके हो और हैरान हो कि नए क्लेश कहाँ से उत्पन्न हो जाते हैं ? क्लेश रहित जीवन के लिए आपको केवल पक्का निश्चय करना है कि आप लोगों के साथ सारा व्यवहार समभाव से निपटाओगे बिना सफलता की चिंता किये बिगैर | फिर एक दिन जीवन में शांति आकर ही रहेगी। यदि बीवी-बच्चों के साथ बहुत उलझे हुए कर्म हों तो निकाल करने में अधिक समय लग जाता है। करीबी लोगों के साथ उलझने क्रमशः ही समाप्त होती हैं। चिकने कर्मों का निकाल करते वक्त आपको अत्यंत जागृत रहना होगा। अगर आपने लापरवाही और सुस्ती दिखाई तो इन मामलों को सुलझाने में असफल होंगे। यदि कोई आपको कटु वाणी बोल दे और आपकी भी कटु वाणी निकल जाए, तो आपके बाहरी व्यवहार का कोई महत्व नहीं, क्योंकि आपकी घृणा समाप्त हो चुकी है और आपने समभाव से निकाल का दृढ़ निश्चय कर रखा है। “प्रतिशोध के सभी भावनाओं से मुक्त होने के लिए आपको परम पूज्य दादाश्री के पास आकर ज्ञान ले लेना चाहिए। मैं आपको इसी जीवन में प्रतिशोध की सभी भावनाओं से मुक्त होने का रास्ता दिखाऊँगा। जीवन से थके हुए लोग मृत्यु क्यों ढूँढते हैं? ऐसा इसलिए क्योंकि वे जीवन के तनाव का सामना नहीं कर पाते। इतने अधिक दबाव में आप कितने दिन जीवित रह सकते हो ? कीड़े-मकोडों की तरह, आज का मनुष्य निरंतर संताप में है। मनुष्य का जीवन मिलने के बाद किसी को कोई दुःख क्यों हो? सारा संसार संताप में है और जो संताप में नहीं है, वे काल्पनिक सुखों में खोए हुए हैं। इन दोनों छोरों के बीच संसार झूल रहा हैं। आत्मज्ञानी होने के बाद, आप सभी कल्पनाओं और वेदनाओं से मुक्त हो जाओगे।’’ दादाश्री की इस पुस्तक में क्लेश रहित जीवन जीने की चाबियाँ और समझ दी गई हैं।

Klesh Rahit Jeevan - Novel: क्लेश रहित जीवन - कादंबरी

by Dada Bhagwan

तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल. दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.

Maitri Bankingashi: मैत्री बँकिंगशी

by Vandana Dharmadhikari

सौ. वंदना धर्माधिकारी लिखित “मैत्री बँकिंगशी” या पुस्तकाची बारावी आवृत्ती आहे, २०११मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. सर्वसामान्यांना बँकिंगबाबतची माहिती सहज, सोप्या पद्धतीने या पुस्तकातून होते. बँकिंगची तांत्रिकता असूनही हे पुस्तक वाचकांना विशेष उपयोगी ठरताना दिसत आहे. बँकिंग ही संकल्पना जरी सर्वत्र एकसारखीच असली तरी आजच्या ऑनलाईन पद्धतीमुळे बँकिंगची सगळी परिभाषा बदलून गेली आहे. प्रत्यक्ष बँकांमध्ये जाण्याची गरज आता उरलेली नाही. अशा या स्पर्धात्मक आणि अत्याधुनिक युगात बँकिंगची संकल्पना सातत्याने बदलत आहे. त्यामुळे त्यातले बारकावे समजून घेत आवश्यक ती माहिती अपडेट ठेवण्याचीदेखील आज गरज आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी, विदेशी, लघुवित्त (Small Finance) अशा सर्वच प्रकारच्या बँका आणि सहकारी पतसंस्था यांमध्ये मूळ बँकिंग जरी सारखेच असले तरी प्रत्येक प्रकारातील नियम आणि व्यवहारातील बदल हे समजून घेणे आवश्यक आहे, ज्याची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. बॅंकिंग क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नवीन नोकरभरती होत आहे. बॅंकिंग करिअर निवडणार्‍या अशा उमेदवारांनादेखील हे पुस्तक योग्य मार्गदर्शन करणारे आहे.

Mahabharatache Rahasya: महाभारताचे रहस्य

by Christopher C. Doyle

महान सम्राट अशोकाला जगाचा विनाश करणाऱ्या एका प्राचीन आणि भयावह रहस्याचा शोध लागला होता. महाभारतात खोलवर ते रहस्य गाडून, 2300 वर्षांपूर्वी ते रहस्य जगापासून लपवून ठेवण्यात आलं होतं. काही हजार वर्षांनी त्या रहस्यामुळेच एका निवृत्त अणुशास्त्रज्ञाचा खून होतो. आपल्या पुतण्यासाठी तो केवळ ई-मेलच्या माध्यमातून काही संकेत ठेवतो. गुप्त प्राचीन सांकेतिक लिपीतील संकेतांमधून आणि 2,000 वर्षांपूर्वीच्या अवशेषांमधून त्याचा पुतण्या आणि त्याचे मित्र त्याच्या ई-मेलची उकल करतात. यांच्या या शोधमोहिमेत ते शक्तिशाली दुष्ट शक्तींच्या पाठलागामुळे भूतकाळातील रहस्ये आणि वर्तमानातील कारस्थाने यांच्या कचाट्यात सापडतात. शब्दांत मांडता न येण्याजोग्या भयानक दहशतीचा पगडा जगावर बसण्याआधी 'ते' गूढ ते उकलू शकतात का?

Prarthana Upchar - Novel: प्रार्थना उपचार - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. मर्फी यांनी हे पुस्तक लिहिले आहे वाचकांना समजावून सांगण्यासाठी की ते त्यांच्या चांगल्या स्त्रोताचा स्रोत कसा प्राप्त करू शकतील आणि योग्य प्रार्थनेद्वारे इच्छित परिणाम मिळवू शकतील. प्रार्थना कशी करावी, रोजच्या कामाचा भाग म्हणून प्रार्थना कशी ठेवावी, आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका इत्यादी प्रार्थना कशी वापरायच्या हे नियतकालिक आहे. मर्फीच्या म्हणण्यानुसार, प्रार्थनेत अडचणीच्या वेळी नेहमीच मदत असते, परंतु प्रार्थनेला आपल्या जीवनातील अविभाज्य आणि रचनात्मक भाग बनविण्यास त्रास मिळण्याची गरज नाही.

Akherache Parv: अखेरचे पर्व

by Vijaya Rajadyaksha

विजयाताईंच्या 'अखेरचे पर्व' या कथासंग्रहात पूर्वप्रकाशित बारा कथांचा अंतर्भाव आहे. त्या त्या दिवाळी अंकाचा स्वभाव किंवा अभिरुचीनुसार या लिहिल्या असल्या प्रत्येक कथेतून मानवी मनाचे... त्यातल्या भावभावनांचे वेगवेगळे पैलू अधोरेखित होतात. कथांतून जे काही घडतं ते वास्तवाच्या परिघातलं असतं. स्वभावदोषामुळे कधी विस्कळीत होणारी, तर सद्भावनेमुळे जोडली जाणारी नाती नित्य प्रसंगांतून व्यक्त होत राहतात. पिढ्यांतील वैचारिक अंतर... मतभेद... क्वचित्प्रसंगी निर्माण होणारा संघर्ष हा सार्वत्रिक अनुभव विजयाताईंच्या सिद्धहस्त लेखणीतून वेगवेगळ्या रूपाने कथाबद्ध होतो. या कथा वाचताना आपल्याला असे जाणवते, की त्या अतिरंजित किंवा अ-वास्तव नाहीत. त्यात कल्पनाविलास नाही. दाद मिळवण्याच्या अभिप्सेने अनिवार्यपणे येणारा लालित्याचा अभिनिवेश नाही. भाषा साधीसोपी मनाला भिडणारी... कथाप्रवाहात वाहून नेणारी आहे. कथेत नाट्य असलेच तरी ते जीवनानुभवाच्या स्तरावरचे आहे. कथा सुखांतिक असेल, तर आपण मोरपिसांचा स्पर्श अनुभवतो आणि शोकांतिक असेल, तर मळभ दाटल्यासारखे अस्वस्थ होतो. कथांतील काही प्रसंग आपल्या पाहण्यातले किंवा कदाचित आपल्या घरात घडल्यासारखे वाटत राहतात. कधी त्यातल्या पात्रांची विचारसरणी आपल्याशी कुठेतरी जुळते असे जाणवत राहते. थोडक्यात, कथाबीजातील 'सर्वसमावेशकता' हे विजयाताईंच्या लेखनातील महत्त्वाचे वैशिष्ट आहे. या संग्रहातील काही कथांचा शेवट वाचकांनी कल्पावा, असा विजयाताईंचा मानस दिसतो. एकूणच अवश्य वाचावा आणि 'फील' करावा असाच हा कथासंग्रह आहे.

His Day: हिज डे

by Swati Chandorkar

समाजातील उपेक्षित घटक असणारे तृतीय पंथीय अर्थात हिजडे यांची ही कहाणी. त्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. कोणी जन्मत:च स्त्री किंवा पुरुषाऐवजी तृतीय पंथी किंवा हिजडा असतो. देहाची जाण/समज आल्यावर कोणी स्त्री आपण पुरुष व्हावे म्हणून तर कोणी पुरुष आपण स्त्री व्हावे म्हणून निसर्गाविरुद्ध जाऊन वाटेल तो त्रास, वेदना सोसायला तयार होतात. एखाद्या स्त्रीला स्त्रीदेहाचे तर एखाद्या पुरुषाला पुरुषदेहाचेच आकर्षण वाटते; अशांना लेस्बियन म्हणतात. दैनंदिन जीवनासाठी त्यांना भीक मागणे, शुभ प्रसंगी बधाईला जाणे किंवा शरीरविक्रय असे मार्ग पत्करावे लागतात. वेगळे जीवन वाट्याला आल्याने आणि समाजाकडून बहुधा तुच्छता तसेच हेटाळणीची वागणूक मिळाल्यामुळे हे सगळे एका छताखाली म्हणजेच एक वस्ती करून राहतात. यांनाही गुरू असतो/असते. सर्वांना आपली कमाई गुरुकडे जमा करावी लागते; त्या बदल्यात गुरू त्यांचे जेवण-खाण, कपडालत्ता, आजारपण यासाठी खर्च करतो/करते. अर्थात गुरू म्हणेल ती पूर्व दिशा! याच चाकोरीतून चेला पुढे गुरू होतो. यांचीही घराणी असतात आणि प्रत्येक घराण्याचा नायक असतो. हिजडा तरुण असताना जगण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड, तडजोड, वेदना यांना अंत नाही. आजार आणि म्हातारपण यांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि तरीही हा तृतीय पंथ ताठ आहे. एकूण हे त्यांचं आयुष्य आहे, जे त्यांनी ‘असं आयुष्य हवं’ म्हणून न मागितलेलं आणि तरीही नशिबी आलेलं. त्यांनाही चांगलं आयुष्य हवं आहे आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचं एकच मागणं आहे – ‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या...’

The Rozabal Line: दि रोझाबल लाइन

by Ashwin Sanghi

दि रोझाबल लाइन ही रहस्यमय कादंबरी अनेक शतकांमधून आणि खंडांमधून उलगडत जाते. अश्विन सांघी गुंत्यांमधील वेटोळ्यांचा माग काढता काढता धर्माच्या रक्तरंजित जन्मापर्यंत पोचतात. लंडनमधील वाचनालयातील एका फळीवर पुठ्ठ्याचे एक खोके सापडते. गोंधळलेल्या ग्रंथपाल ते खोके उघडतात. ते खोके उघडताच त्यांच्या तोंडून किंकाळी फुटते आणि लगेचच त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतात. स्वतःला लष्कर-ए-तलतशार म्हणवणारं तेरा जणांचं सैन्य जगभर विखुरलेलं आहे. ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांचे दैव आणि या सैन्यातील सदस्यांचे दैव यांच्यात एक कुतूहलजनक साम्य आहे. त्यांचं ध्येय आहे आर्मागेडॉन. एका हिंदू ज्योतिष्याला आकाशातील विशिष्ट ग्रहांची युती जवळ आल्याचं लक्षात येतं. जगाचा अंत जवळ आल्याच्या जाणिवेने तो सुन्नपणे मान हलवतो. तिकडे तिबेटमध्ये एक बौद्ध भिक्खूंचा समूह ज्याप्रकारे त्यांच्या पूर्वजांनी ज्युदेआमध्ये ईश्वरपुत्राचा शोध घेतला होता त्याचप्रमाणे अवताराच्या शोधात निघतो. जेरुसलेममध्ये निर्माण झालेल्या या कोड्याची गुरूकिल्ली असते संघर्षाने ग्रस्त काश्मीरमधल्या रोझाबल नावाच्या एका कबरीत आणि ते कोडं सुटणार असतं वैष्णोदेवीत. एका अमेरिकन प्रिस्टला परिचित माणसांची अस्वस्थ करणारी दृश्यं दिसतात. फक्त ही दृश्यं आणि त्यातली लोकं कुठल्यातरी दुसऱ्याच काळात आहेत, असं त्याला वाटतं असतं.

Refine Search

Showing 51 through 75 of 1,427 results