Browse Results

Showing 1,376 through 1,400 of 1,427 results

Gandhi Parv: गांधी पर्व

by T. V. Parvate

महाराष्ट्राच्या आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एक नवीन पर्व सुरु केले. १ ऑगस्ट, १९२० ला लोकमान्य टिळकांचे निधन झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीची धुरा महात्मा गांधीजींच्या खांद्यावर आली आणि ३० जानेवारी, १९४८ ला त्यांची हत्त्या होईपर्यंत ते राष्ट्राचे एकमेव असे नेते राहिले. त्यांच्या हयातीतच सामुदायिक असहकाराची चळवळ, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो इत्यादी चळवळी झाल्या. आणि शेवटी त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीनी केवळ राजकीय चळवळी केल्या नाहीत तर सामाजिक चळवळीही फार मोठ्या प्रमाणात करण्याचे श्रेय त्यांचे आहे. चरखा संघ, ग्रामोद्योग संघटना, कुष्ठरोग निवारणाची चळवळ इत्यादी अनेक विधायक चळवळी पण त्यांनी सुरु केल्या.

Iliad: इलियद

by Shamrao Nilkanth Oak

ग्रीक महाकवी होमर लिखित “Iliad” या ग्रीक महाकाव्याचे सँम्युएल बटलर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे मराठी भाषान्तर शामराव नीळकंठ ओक यांनी केले आहे. इलियड हे होमरचे जगप्रसिद्ध महाकाव्य आहे. यात ट्रॉय या ग्रीक शहरात झालेल्या युद्धाच्या विजयाचे आणि विध्वंसाचे वर्णन आहे. हे युद्ध ट्रॉजन युद्ध म्हणून ओळखले जाते.

Kai. Veer Vamanrao Joshi Hyanchi Natake: कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके

by Dr Madhukar Ashtikar

नाटककार म्हणून वीर वामनराव जोशी महाराष्ट्रात गाजलेच. त्यांची नाटके रंगली. लोकांनी डोक्यावर घेतली. त्यातली गाणी ओठाओठांवर रुळली. कित्येक बुडत्या नाटककंपन्यांची नौका सुखरूप किनाऱ्याला लागली. पण ह्या वैदर्भीय नाटककाराची समीक्षकांनी मात्र तशी उपेक्षाच केली. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मु. श्री. कानडे ह्यांनी लिहिलेल्या ‘कालचे नाटककार’ ह्या पुस्तकात त्यांच्यावरचा एक लेख, एवढीच दादांच्या नाटकावरची उपलब्ध समीक्षा! बाकी किरकोळ प्रासंगिक वजाबाक्या आणि ऐतिहासिक पठाणी खाक्याच्या नोंदीच त्यांच्या नशिबी आल्या. म्हणूनच कै. वीर वामनरावदादांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात त्यांच्या नाटकांची समीक्षा व्हावी आणि त्यांची संहितादेखील रसिकांना उपलब्ध रहावी ह्या हेतूने साहित्य संस्कृती मंडळाने प्रस्तुत पुस्तक कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके, एक समीक्षा व संपादित नाट्य संहिता - अशा स्वरूपात ती तयार केली आहे.

Samrajyavadi Shadyantra: साम्राज्यवादी षड्‌यंत्र

by Dr Shanta Kothekar Sau Suman Vaidya

प्रस्तुत पुस्तक “साम्राज्यवादी षड्‌यंत्र” हे अलबर्ट काहन आणि मायकेल सेयर्स या अमेरिकन लेखकांच्या “The Great Conspiracy against Russia” ह्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे. जागतिक शांतता टिकून राहण्याकरिता इतर कोणत्याही गोष्टीमुळे झाले नसेल इतके मोलाचे योगदान या ग्रंथामुळे झाले आहे. ग्रेट ब्रिटन, अमेरिका व रशिया यांत परस्पर सलोखा व सद्‌भाव असला तरच जगात खऱ्या अर्थाने टिकावू शांतता नांदू शकेल. रशियन क्रांतीनंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचे दर्शन रशियाच्या अनुभवांच्या चष्म्यातून या ग्रंथाद्वारे लेखकांनी घडविले आहे; रशियनांना आपल्याबद्दल काय वाटते हे त्यांनी आपल्याला जाणवून दिले आहे. या ग्रंथात वर्णन केलेल्या कारस्थानांसारखी सोविएतविरोधी कारस्थाने जर अशीच चालू राहिली तर त्याचा परिणाम तिसऱ्या महायुद्धात होईल हे उघडच आहे. म्हणूनच जागतिक शांतता टिकावी याची कळकळ असलेल्या सर्व ब्रिटिश व अमेरिकन मुत्सद्यांनी, एवढेच नव्हे तर त्या दोन्ही राष्ट्रांतील सामान्य नागरिकांनीही या ग्रंथाचे परिशीलन करणे अगत्याचे आहे. आज संपूर्ण मानव जात सर्वसंहारक अशा स्टार वॉरच्या भयाने भयाकुल झालेली असता या विनाशकारी परिस्थितीची बीजे कशी व कोठे रोवली गेली यावर प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टिने हा ग्रंथ अतिशय मोलाचा ठरतो.

Odyssey: ओदिसी

by Shamrao Nilkanth Oak

ग्रीक महाकवी होमरलिखित ‘Odyssey’ या काव्याचा कै. शामराव निळकंठ ओक यांनी केलेला मराठी अनुवाद साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. इलियद व ओदिसी ही एकाच कथावस्तूची जुळी रूपे आहेत. तो विषय म्हणजे त्रोजन युद्ध आणि त्यानंतरच्या घटना. पाश्चात्य मनाचे पहिले दर्शन साहित्यात होते ते याच दोन महाकाव्यांत असे म्हणावयास हरकत नाही. अगोदरच्या लोककथा, वीरचरित्रे, पुराणे इत्यादी सामग्री घेऊन होमरने एक इतिहासवजा कथानक आपल्या महाकाव्यांत गुंफले आहे. कृतीचे स्वरूप जरी महाकाव्याचे असले तरी इलिअद हे एक शोकनाट्य व ओदिसी ही एक कादंबरी आहे असे म्हटल्यास त्यांचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल. ओदिसीचे संविधानक सुसंघटित, तिच्यामधील व्यक्तींच्या मनोव्यापाराचे चित्रण वेधक आणि त्यांचे परस्परसंबंध रंजक असल्याने ही वीरगाथा हळूहळू परिणत होत गेलेल्या आजच्या कादंबरीची आद्यजननी मानता येईल; आणि जरी ती इतकी प्राचीन असली तरी आजही ती एक कादंबरी म्हणून उत्कृष्ट ठरेल.

Shri Keshav Kshirsagar Wangmayin Lekhsangrah: श्री. केशव क्षीरसागर वाङ्मयीन लेखसंग्रह

by Prof. Shri K. Kshirsagar

प्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी १९३० ते १९७९ या पन्नास वर्षांच्या काळात लिहिलेल्या परंतु अद्याप ग्रंथनिविष्ट न झालेल्या लहानमोठ्या एक्याऐशी वाङ्मयीन लेखांचा या संग्रहात समावेश केला आहे. या पुस्तकामुळे आपणांस त्यांची वाङ्मयीन मते नव्यानेच कळणार आहेत असे नाही. पण वेगवेगळ्या नियतकालिकांच्या संचात विखुरलेले त्यांचे विचारधन एकत्र मिळालेले आहे. या लेखसंग्रहात साहित्य आणि स्वातंत्र्यसंग्राम, साहित्य आणि जीवन, मराठी वाङ्मयावरील परकीय संस्कार, कलावंताचे चारित्र्य, आधुनिकता क्या चीज है, अशांसारखे प्रश्न उत्पन्न करणारे लेख आहेत.

Vinoba Jeevan Darshan: विनोबा-जीवन-दर्शन

by Shivaji N. Bhave

१५ नोव्हेंबर १९८२ ला पूज्य विनोबाजींचा आत्मा ब्रह्मात विलीन झाल्याची बातमी आली. प्रत्येक नश्वर देहाला पंचत्वात विलीन व्हावेच लागते. पण सर्वांच्याच विलीन होण्याची नोंद घेण्यात येत नसते. विनोबाजींचे व्यक्तित्व हे असामान्य. श्री. अरविंदांनी आपल्या कल्पनेतला महामानव रंगविताना महात्मा गांधी आणि विनोबा यांचे चित्र डोळ्यासमोर ठेवले असेल किंवा नाही कोण जाणे. पण सामान्य माणूस जेव्हा माणसातल्या या हिमालयाकडे पाहातो तेव्हा तत्त्वज्ञांनी वर्णन केलेला महामानव तो हाच, असे त्याला वाटल्यावाचून रहात नाही. स्वभावविशेषाच्या भिन्नतेमुळे गांधी, नेहरू, विनोबा, अरविंद, रवीन्द्रनाथ, मार्क्स, रसेल, शंकराचार्य, ज्ञानेश्वर हे वेगवेगळे भासतील हे खरे. पण हे सगळेच महामानव होते यांत शंका नाही. पूज्य विनोबांचे सगळेच सामान्य माणसापेक्षा वेगळे. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे वेगळे. त्यांचे मरण पण वेगळे. साहित्य-संस्कृति-मंडळातर्फे पूज्य विनोबाजींचे चरित्र प्रकाशीत करण्यात आले आहे. कु. निर्मला देशपांडे, श्री. रमाकांत पाटील, श्री. म्हसकर, श्री. गौतम बजाज आणि विनोबाजींचे खाजगी चिटणीस श्री. बाळ विजय इत्यादींच्या सहकार्यामुळे विनोबाजींचे चरित्र आज प्रसिद्ध करण्याचा योग येत आहे.

Acharya Bhagwat Sankalit Wangmay Khand 1: आचार्य भागवत संकलित वाङ्मय खंड १

by Achyut Keshav Bhagwat

गांधीयुगात महाराष्ट्रात आचार्य जावडेकरांसारखे जे निष्ठावंत बुद्धिमंत निर्माण झाले त्यांतीलच आचार्य भागवत हे एक. त्यांनी केवळ सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानाचाच महाराष्ट्रात प्रचार केला नाही तर समाजवादाची मूलभूत तत्त्वेही जनसामान्यांपर्यंत पोचविली आणि महाराष्ट्राचे सर्वतोपरी प्रबोधन केले, एक संपूर्णपणे नवी पिढी घडविली. आचार्य भागवत हे विचारवंत तर होतेच, त्याचबरोबर ते उत्कृष्ट वक्तेही होते. अशा थोर व्यक्तीचे वाङ्मय दोन खंडांत संकलित करून प्रसिद्ध करण्याचे साहित्य संस्कृती मंडळाने ठरविले. प्रस्तुत ग्रथ हा त्यांतील प्रथम खंड होय. या पहिल्या खंडात अनेक विषयांवरील लेख आहेत. इस्लामची शिकवण, अध्यात्म आणि विज्ञान, स्त्रीचे समाजातील स्थान, ध्येयवादाचे विवेचन, समाजधारणेची नवी मूल्ये हे त्यांपैकी काही. मानवनिष्ठा व मानवप्रेम हे तर्ककर्कश आचार्यांच्या विचारांमागील मुख्यसूत्र. त्यातून त्यांच्या साऱ्या विचारांचे नवनीत विकसित होते.

Aeneid: इनिइड

by Prof. Dattatraya Raghunath Ghodke

“दी इनिइड बाय व्हर्जिल” या पुस्तकाचे भाषांतर प्रा. द.र. घोडके यांनी मराठी भाषेमध्ये केले आहे. या पुस्तकामध्ये एनियासची कथा सांगतली आहे. एक ट्रोजन नायक, जो त्याच्या शहराच्या पडझडीनंतर त्याच्या शहरातून पळून जातो, त्याचे वडील एन्चिसेस आणि त्याचा तरुण मुलगा अस्कानियस. एनियासला रोम आणि वडील रोमन वंशाचा शोध घेण्यासाठी निघाले. एनियास त्याच्या ध्येयाच्या जवळ जात असताना, त्याने प्रथम त्याची योग्यता सिद्ध केली पाहिजे आणि अशा उत्कृष्ट कार्यासाठी आवश्यक परिपक्वता प्राप्त केली पाहिजे. तो भूमध्यसागरीय वादळांशी लढतो, भयानक चक्रीवादळांचा सामना करतो, कार्थेजची राणी डिडोच्या प्रेमात पडतो, अंडरवर्ल्डमध्ये प्रवास करतो आणि इटलीमध्ये युद्ध पुकारतो.

Samajik Thar: सामाजिक थर

by Sau. Sarla Karkhanis

अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे समाजशास्त्रज्ञ मेल्विन एम्‌. ट्युमिन यांच्या ‘सोशल स्ट्रॅटिफिकेशन- द फॉर्म्स अँड फंक्शन्स ऑफ इन्इक्वॉलिटी’ या पुस्तकाचा हा अनुवाद ‘सामाजिक थर: विषमतेचे प्रकार व कार्य’ या नावाने प्रसिद्ध होत आहे. अनेक समाजसंशोधकांनी तयार केलेल्या प्रबंधाच्या आधारावर लेखकाने या पुस्तकात सामाजिक विषमतेचा प्रश्न सविस्तरपणे मांडला आहे. कार्ल मार्क्स व मॅक्स वेबर या दोन मूलग्राही विचारवंतांच्या दृष्टिकोनांचा, कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा संयोग सामाजिक घडणीच्या आधुनिक अभ्यासकांच्या भूमिकेत आढळतो, असे लेखकाने प्रतिपादन केले आहे. लेखकाची मांडणी सरळ व सुस्पष्ट आहे आणि ती प्रत्यक्षावर-पहाणी व संशोधने यांवर आधारलेली आहे. त्यामुळे भारतीय समाज-अभ्यासकांना आपल्या अनुभवांशी त्यातील प्रतिपादने जोखून पाहणे शक्य होईल. पूर्वापार भारतीय समाजपद्धतीचाही उल्लेख लेखकाने अनेकदा केला आहे. आपल्या आजच्या बदलत्या परिस्थितीत त्यात होणारे फरक का व कसे होत आहेत याचा शोध घेण्यास या पुस्तकाचा मार्गदर्शनपर उपयोग होईल.

Sybil: सिबिल

by Madhavi Kolhatkar

‘सिबिल’ ही अमेरिकेत घडलेली सत्यकथा. ‘सिबिल’ हे टोपणनाव असलेली ही मुलगी अतिशय बुद्धिमान्, उत्तम चित्रकार. पण शाळा- कॉलेजात असताना तिला विचित्र अनुभव यायला लागले. तिचा दिवसा- तासांचा मेळ बसेना. आयुष्यातला बराच काळ हा आपण न जगताच जातो आहे, असं तिला वाटायचं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यापेक्षा आपलं आयुष्य काहीतरी वेगळं आहे; कुठेतरी, काहीतरी चुकतं आहे, असं जाणवल्यावर धाडस करून ती मनोविकारतज्ज्ञांकडे गेली. त्यांनी तिचा सर्व इतिहास जाणून घेऊन निदान केलं, ते भग्नव्यक्तित्वाचं. ‘सिबिल’ मध्ये एकूण सोळा व्यक्तित्वं आढळली. त्यातली पेगीसारखी काही व्यक्तित्वं भरपूर खात, हिंडत, उल्हासाने जगत; तर सिबिल ॲन्‌सारखी इतर काही एक पाऊल उचलण्याच्या कल्पनेनंही थकून जात.

Itukali Mitukali Teen Madaki

by Sane Guruji

Story of a poor man who was gifted three pots which supplied food and giants, which made him wealthy in marathi.

Samanata: समानता

by Shri. Dinkar Sakrikar

प्रस्तुत भाषांतर हे टॉने याच्या ‘इक्वालिटी’ या ग्रंथाचे आहे. या ग्रंथात त्यांनी समानतेच्या संकल्पनेचा अत्यंत सांगोपांग व शास्त्रशुद्ध असा उदापोह केला आहे. त्यांची समानतेची कल्पना ही सामाजिक न्यायाच्या संपूर्ण अशा आकलनावर आधारलेली आहे, समाजाच्या मध्यवर्ती आणि चिरस्थायी अशा प्रक्रियेतच समानता अनुस्यूत असली पाहिजे. समाजातील लोकांचे परस्परांशी उचित संबंध अशी ते समानतेची व्याख्या करतात. हा संपूर्ण विचार त्यांच्या मूळ ग्रंथातूनच समजून घेतला पाहिजे.

Samanata

by Shri. Dinkar Sakrikar

प्रस्तुत भाषांतर हे टॉने याच्या ‘इक्वालिटी’ या ग्रंथाचे आहे. या ग्रंथात त्यांनी समानतेच्या संकल्पनेचा अत्यंत सांगोपांग व शास्त्रशुद्ध असा उदापोह केला आहे. त्यांची समानतेची कल्पना ही सामाजिक न्यायाच्या संपूर्ण अशा आकलनावर आधारलेली आहे, समाजाच्या मध्यवर्ती आणि चिरस्थायी अशा प्रक्रियेतच समानता अनुस्यूत असली पाहिजे. समाजातील लोकांचे परस्परांशी उचित संबंध अशी ते समानतेची व्याख्या करतात. हा संपूर्ण विचार त्यांच्या मूळ ग्रंथातूनच समजून घेतला पाहिजे.

Vatchal: वाटचाल

by Nana Kunte

ही वाटचाल आहे माझ्या सार्वजनिक जीवनाचा मी स्वतः काढलेला आलेख. दर्यासारंग आंग्रे घराण्याची राजधानी, कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण अशा मोठ्या बिरुदांनी आमचे अलिबाग बाह्य जगाला परिचित असले तरी प्रत्यक्षात आजही त्याची लोकसंख्या दहा हजारांपलीकडे फारशी गेलेली नाही. अशा गावात माझे मॅट्रिकपर्यंतचे आयुष्य गेले. रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी अलिबागजवळच्या नागाव या अष्टागरातील एका प्रमुख गावी आल्यापासून फक्त शेती-बागायती करणाऱ्या, पोटापुरते मिळविणाऱ्या शेतकरी कुटुंबातील नव्याने वकील झालेल्याचा मी मुलगा. एकत्र कुटुंब, प्रमुख व्यवसाय शेती-बागायत. अष्टागरातील शेतकरी कोणत्याही जातीचा असो, आपल्या शेतात, वाडीत स्वतः राबणारा आणि त्यात धन्यता मानणारा. आपले प्रौढ जीवन सार्वजनिक कामात घालवावे असे मला लहानपणापासून वाटत आलेले आहे. शिवाजीच्या मावळ्यांप्रमाणे स्वराज्याकरिता झटण्याचे आकर्षण. इतिहासात शिवाजीने आणि माझ्या बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घालून दिलेला धडा गिरवावा अशी स्वप्ने मी पाहात असे. प्रभू रामापेक्षा हनुमान किंवा शिवाजीपेक्षा तानाजीच मला जास्त आवडे. नाथमाधवांचा ‘सावळ्या तांडेल’ पुस्तकरूपाने आणि शिवरामपंत परांजप्यांची ‘गोविंदाची गोष्ट’ चित्रमयजगत् या मासिकात वाचलेली.

Itukali Mitukali Pakharachi Gost

by Sane Guruji

Story of a man named Khandu. He had a very bad wife who used to ill treat treat him. she was so bad that she cut the toungue of a bird too in marathi.

Itukali Mitukali Sonyachi Sakhali

by Sane Guruji

Story of two Queens who did not bear child, but when one delivered a child the other queen wanted to take his life, but in the end she starts loving her in marathi.

Moghal Samrajyacha Rhas: मोगल साम्राज्याचा ऱ्हास

by Sir Jadunath Sarkar

‘मोगल साम्राज्याचा ऱ्हास’ हे पुस्तक थोर इतिहास-संशोधक सर जदुनाथ सरकार यांनी लिहिलेले. या पुस्तकाचे एकूण चार भाग आहेत. त्यांतील तिसऱ्या भागातील मजकुराचा हा मराठी अवतार. मुगल साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे व मीमांसा करताना या महान संशोधकाने शब्दशः हजारो हस्तलिखिते वाचली, अज्ञात कागदपत्रे चाळली व हा थोर ग्रंथ लिहिला. मराठीत अनुवाद केलेल्या या तिसऱ्या भागात २६ ते ३७ अशी एकूण बारा प्रकरणे आहेत.

Pavankhind: पावनखिंड

by Ranjeet Desai

महाराष्ट्र, पश्चिम भारतातील राज्य, तेराव्या शतकापासून मुस्लिमांच्या अधिपत्याखाली होते. सुमारे चारशे वर्षे बाहेरून अत्याचारी आणि असहिष्णू राजे होते ज्यांनी स्थानिक लोकसंख्येला शांततेत जगू दिले नाही. सतराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकर्त्यांना आव्हान देऊन मराठा साम्राज्याची स्थापना करेपर्यंत लूट, धर्माच्या नावाखाली शोषण, बलात्कार आणि हिंसाचार सुरूच होता. त्याचे मिशन केकवॉक नव्हते: त्याचे आतून, राज्याबाहेरचे शत्रू होते तसेच इतर देशांतील (पोर्तुगीज आणि ब्रिटीशांनी त्यांचे सध्याचे फ्लोली फेल्ट बनवले होते) किंवा छत्रपती शिवाजींना मदत करणारा घटक महाराजांनी एक साम्राज्य निर्माण केले ज्याचा विस्मय होता. पावनखिंड ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे जी पावनखिंडच्या युद्धाकडे नेणाऱ्या घटनांचा समावेश करते. (पावनखिंड हा कोल्हापुर जवळचा रस्ता आहे.) राजाने खिंडीला वेढा घालून यशस्वीपणे मार्ग काढला; बाजी प्रभू देशपांडे यांना धन्यवाद ज्यांनी ब्रेक थ्रू शक्य केला.

Baba Padmanji Kal Va Kartrutva: बाबा पदमनजी: काल व कर्तृत्व

by Dr Keshav Sitaram Karhadkar

‘बाबा पदमनजी: काल व कर्तृत्व’ हा ग्रंथ ‘बाबा पदमनजी: व्यक्ति व वाङ्मय’ या दृष्टिकोनातून डॉ. के. सी. कऱ्हाडकर यांनी सखोल व व्यासंगी संशोधन करून पुणे विद्यापीठास जो पी. एच्. डी. चा प्रबंध सादर केला त्याचाच ग्रंथरूपाने केलेला आविष्कार आहे. डॉ. कऱ्हाडकरांनी बाबांच्या ग्रंथातील, पुस्तिकांतील आणि नियतकालिकांतील लेखांमधील, आशयाची थोडक्यात संकलन करून त्यांच्या या आत्मकेंद्री पारमार्थिक वृत्तीवर चांगल्या रीतिने प्रकाश टाकण्याचे साधन उपलब्ध करून दिले आहे आणि त्यांचा काही महत्त्वाचा पत्रव्यवहार परिशिष्टातून उद्‌धृत करून बाबांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे.

Kibbutz Navsamaj Nirmiticha Ek Prayog: किबुट्झ: नवसमाज निर्मितीचा एक प्रयोग

by S. H. Deshpande Kusum Deshpande

इस्त्रायली किबुट्‌झ हा समाजवादाचा एक वेगळ्या धर्तीचा आणि अधिक उन्नत प्रयोग आहे. तथाकथित ‘समाजवादी’ देशांतील समाजवादापेक्षा किबुट्झच्या समाजवादाचा आशय अधिक समृद्ध असून त्याचे तंत्रही अधिक प्रभावी आहे. इस्त्रायल राष्ट्राच्या उभारणीत तर किबुट्झचा ऐतिहासिक वाटा एवढा मोठा आहे की किबुट्‌झशिवाय इस्त्रायलचा विचार करणेही अशक्य आहे. शिवाय किबुट्‌झने आर्थिक व्यवहार, सामाजिक रचना, शिक्षण इत्यादि क्षेत्रांमध्ये इतके नवीन प्रयोग केलेले आहेत की समाजशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ, संस्कृतिशास्त्रज्ञ ह्यांनी त्याचा हरतऱ्हांनी अभ्यास केला आहे. मराठी वाचकांना ह्या प्रयोगाची ओळख व्हावी म्हणून किबुट्‌झविषयक एका महत्त्वाच्या पुस्तकाचा अनुवाद विवेचक प्रस्तावनेसह या ग्रंथात सादर करण्यात आला आहे.

Shakespeare Paricaya grantha: शेक्सपिअर परिचय ग्रंथ

by Maharashtra Rajya Sahitya Sanskriti Mandal Mumbai

शेक्सपिअरच्या जन्माला इ.स. १९६४ मध्ये ४०० वर्षे पूर्ण झाली. त्या वर्षी सर्व जगभर झालेल्या उत्सवावरून या अद्वितीय नाटककाराची मोहिनी जनमानसावर किती आहे हे दिसून आले. प्रत्येक देशात थोड्याफार प्रमाणावर त्याचे वाङ्‌मय व चरित्र याबद्दल चर्चा करण्यात आली. इंग्लिश बोलणाऱ्या देशांत व विशेषतः इंग्लंड, अमेरिका वगैरे देशांत गौरवग्रंथ निर्माण झाले, शेकडो व्याख्याने, परिषदा वगैरे कार्यक्रम घडून आले व आधीच जगप्रसिद्ध असलेल्या या साहित्यसम्राटाची कीर्ती सामान्य लोकांच्या कानांवरही सारखी पडत राहिली. शेक्सपिअरबद्दल आतापर्यंत निरनिराळ्या देशांतून व भाषांतून इतके लेखन झाले आहे की त्या लेखनानेच अनेक मोठी ग्रंथालये भरू शकतील. केवळ शेक्सपिअरचे ग्रंथ व त्यांवरील वाङ्‌मय याकरिता स्वतंत्र ग्रंथालये अनेक देशांत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे फक्त शेक्सपिअरच्या वाङ्‌मयाची चर्चा करणारी अनेक नियतकालिकेही आहेत. इंग्लंडमध्ये दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या Shakespeare Survey सारख्या उच्च दर्जाच्या पुस्तकांत शेक्सपिअरसंबंधी चाललेल्या संशोधनाचा आढावा, नवीन ग्रंथांची परीक्षणे, इतर भाषांतील संशोधन वगैरे सर्व गोष्टींचा उल्लेख असतो. अशाच तऱ्हेची बरीच नियतकालिके अमेरिका, जर्मनी इत्यादी देशांतही वर्षानुवर्षे चालू आहेत हे लक्षात घेतले म्हणजे मन अश्चर्याने थक्क होऊन जाते. कारण सुमारे ३७-३८ नाटके व काही खंडकाव्ये यांवर अनेक ग्रंथालये भरतील इतके वाङ्‌मय सारखे प्रसिद्ध होत राहावे यावरून शेक्सपिअरबद्दलच्या लोकांच्या भावना, त्याच्याबद्दलचा आदर व त्याची लोकप्रियता, यांची कल्पना येऊन तो एक अतिमानव (Supermen) असला पाहिजे असे वाटू लागते. जगातील कोणत्याही लेखकाबद्दल इतके अव्याहत लेखन अद्यापि तरी झाले नाही व होऊ शकेल असे वाटत नाही. या अलौकीक यशाचे रहस्य काय याचा थोडासा विचार या ग्रंथात केला आहे..

Akraman: आक्रमण

by D. D. Karve

दि. धों. कर्वे यांनी कोन्राड लोरेंत्स लिखित यांच्या ‘ऑन अग्रेशन’ या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे व ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ तर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. ह्या कादंबरीचा विषय “आक्रमण” हा आहे. म्हणजे पशू व मानव ह्यांच्यात जी उपजत अशी लढाऊ वृत्ती आपल्या सजातीयांबद्दल असते तिच्याबद्दल येथे ऊहापोह केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथात लोरेंत्झने पृष्ठवंशीयांतील आक्रमक प्रवृत्तीच्या उत्क्रांतीचा विचार केलेला आहे. त्याने असे दाखवून दिले आहे की आक्रमक प्रवृत्ती व लुटारूपणा किंवा शुद्ध हल्लेखोरपणा हे दोन अगदी वेगळे आहेत. आक्रमक प्रवृत्ती ही आपल्या प्रदेशाच्या संरक्षणाकरता, तसेच एखाद्या चोहीकडून वेढलेल्या प्राण्याच्या बचावाकरता जरूर आहे आणि ती इतर जन्मजात गुणांबरोबरच मिश्रित होऊन स्वजातीय प्राण्याचा नाश शक्य तितका कमी करते. मानवाजवळ आपली वर्तणूक संस्कारक्षम करण्याचे अनेक उपाय आहेत व त्यांतले पुष्कळ प्राण्यांच्याशी साधर्म्य दाखवणारे आहेत. एकंदरीतच “आक्रमण” हे पुस्तक त्या विषयाच्या तज्ज्ञाने लिहिले असून अत्यंत आकर्षक व माहितीपूर्ण असे झाले आहे.

Aurangzebacha itihas: औरंगजेबाचा इतिहास

by Sir Jadunath Sarkar

सर जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाचे चरित्र प्रथम पाच खंडात प्रसिद्ध केले. त्यानंतर १९३० मध्ये त्यांनी या पाच खंडांचे संकलन करून औरंगजेबाच्या चरित्र-ग्रंथाची एक छोटी आवृत्ती A Short History of Aurangzib या नावाखाली प्रसिद्ध केली. त्या ग्रंथाचा मराठीमध्ये केलेला हा अनुवाद आहे. ग्रंथाच्या मजकुराची मूळ इंग्रजी पाने ४६२ असून ग्रंथाची विभागणी २० प्रकरणात करण्यात आलेली आहे. औरंगजेबाची एकंदर हयात ८९ वर्षांच्या कालखंडावर पसरलेली असून त्याच्या प्रत्यक्ष कारकीर्दीचा कालखंड ४९ वर्षांएवढा आहे. औरंगजेबाचे खासगी जीवन, त्याची राजकीय कारकीर्द, त्याची राज्यकारभाराची पद्धत, तत्कालीन सामाजिक, अर्थिक आणि व्यावहारीक जीवन, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या कारकीर्दीचे आणि धोरणाचे हिंदुस्थानच्या इतिहासावर झालेले परिणाम या सर्वांचा अतिशय साकल्याने असा परामर्ष सर जदुनाथ यांनी आपल्या औरंगजेबाच्या या चरित्रग्रंथात घेतला आहे.

Bandkhoriche Tattvadnyan: बंडखोरीचे तत्त्वज्ञान

by Shree. B.V. Marathe

“बंडखोरीचे तत्त्वज्ञान” हा लेख अल्बेर कामूच्या “द रिबेल” या ग्रंथाचे मराठी भाषांतर केलेले आहे. “बंडखोरीचे तत्त्वज्ञान” या ग्रंथात समाजातील समाजातील, विशेषतः पश्चिम युरोपमधील बंड आणि क्रांतीच्या आधिभौतिक आणि ऐतिहासिक विकासावर प्रकाश टाकला आहे. अल्बेर कामूचे ‘बंडखोर’ म्हणजे राजनीतीचे तत्त्वज्ञान. गेल्या दोन शतकातील इतिहास व तत्त्वज्ञान यांच्यातील ज्ञानसंपदेच्या पार्श्वभूमीवर, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या युरोपमधील राजकीय, सामाजिक, आर्थिक व वैचारिक परिस्थितीचे ते उत्कृष्ट विवेचन व विवरण आहे.

Refine Search

Showing 1,376 through 1,400 of 1,427 results